शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

परभणी जिल्ह्यात २ हजार कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:40 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़परभणी जिल्ह्यात १० राष्ट्रीयकृत बँका असून, या बँकांमधील अधिकारी व कर्मचाºयांनी पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी ३० मे रोजी संप पुकारला़ सकाळी १० वाजेच्या सुमारास सर्व अधिकारी, कर्मचारी दाखल झाले; परंतु, या कर्मचाºयांनी कामकाज न करता स्टेट बँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर निदर्शने केली़ यावेळी इंडियन बँक असोसिएशन व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या़ युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनमध्ये समाविष्ट असलेल्या ९ संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते़ मुख्य प्रतिनिधींनी बँक कर्मचाºयांची सध्याची परिस्थिती व इतर बाबींवर मार्गदर्शन केले़ डॉ़ सुनील टाके, डॉ़ सुनील हट्टेकर, भास्कर विभुते, अशोक पिल्लेवार, सौरभ देगावकर, प्रशांत जोशी, रणजीत काकडे, बालासाहेब साठे, प्रणयकुमार विश्वास, चंद्रकांत लोखंडे, योगेश गुंडाळे यांनी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले़ परभणी जिल्ह्यातील १९ बँकांमधील सुमारे ८०० कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे़गुरूवारीही असणार संपयुनायटेड फोरम आॅफ बँक या संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला असून, ३१ मे रोजीही हा संप केला जाणार आहे़ गुरुवारी सकाळी १० वाजता शिवाजी चौकातील बडोदा बँकसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत़ बुधवारचा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. स्टेट बँकेच्या पेन्शनर्स असोसिएशनने संपात सहभाग नोंदविला़ यावेळी राम खरटमल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़बँकींग व्यवहार विस्कळीतजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका बंद असल्या तरी स्थानिक बँकांचे कामकाज सुरू होते़ मात्र बंदमुळे आरटीजीएस, ट्रान्सफर, चेक क्लेरसन्स या सेवा विस्कळीत झाल्या होत्या़ राष्ट्रीयकृत बँका बंद असल्याने जवळपास २ हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती बँकांमधील सूत्रांनी दिली़ तसेच शहरातील एटीएम मशीनमध्ये खडखडाट दिसून आला़ त्यामुळे ग्राहकांची धावपळ झाली़

टॅग्स :parabhaniपरभणीBanking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंप