शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की कोंबून भरलेली काली-पिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST

परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अद्यापही प्रवासी संख्या जास्त असलेल्या रेल्वेंना जनरल डबे लावण्यात आलेले नाहीत. यामुळे ...

परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अद्यापही प्रवासी संख्या जास्त असलेल्या रेल्वेंना जनरल डबे लावण्यात आलेले नाहीत. यामुळे आरक्षित डब्यातून प्रवासी तिकीट न काढता किंवा थेट तिकीट तपासणीस आल्यावर पैसे देऊन अनेक जण प्रवास करत आहेत. यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.

परभणी येथून सध्या २२ ते २४ विशेष एक्स्प्रेस रेल्वे सुरू आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासह दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वेंना कोरोनामुळे विशेष रेल्वेचा दर्जा दिल्याने जनरल डबे अद्यापही लावण्यात आलेले नाहीत. या विभागातील १० ते १२ रेल्वेंना १ किंवा २ जनरल डबे जोडले आहेत. मात्र, त्या रेल्वेपेक्षा या भागातील प्रवासी संख्या जास्त असलेल्या मराठवाडा, पनवेल, तपोवन, देवगिरी, सचखंड, नंदिग्राम या रेल्वेंना हे जनरल डबे जोडणे आवश्यक आहे.

सचखंडमध्ये विक्रेत्यांची गर्दी जास्त

नांदेड- अमृतसर व अमृतसर- नांदेड या दोन्ही रेल्वेच्या आरक्षित डब्यांत सर्वाधिक त्रास फेरीवाल्यांचा सहन करावा लागतो. पेंट्री कारचा स्वतंत्र डबा असताना काही स्थानकांवर विविध खाद्यपदार्थ घेऊन विक्रेते या रेल्वेतील सर्व डब्यांतून फिरतात, तसेच टीसी प्रवाशाने तिकीट नसताना अचानक प्रवेश केला, तर त्यास आरक्षण डब्यात प्रवेश देतात, तसेच बसण्यास जागाही उपलब्ध करून देतात. यामुळे आधीपासून आरक्षण केलेल्या प्रवाशांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागते.

मराठवाडा, तपोवनमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही

सध्या आरक्षण न करता तसेच अप-डाऊन करणारे प्रवासी आरक्षित डब्यात थेट प्रवेश करीत आहेत. या रेल्वेमध्ये रेल्वे पोलीस, तसेच टीसी लक्ष देत नाहीत. अनेकदा विक्रेत्यांसोबत प्रवाशांचा वाद होऊन मारामारी झाल्याचे प्रकारही घडले आहेत, तसेच पैसे मागणारे, भिकारी यांचाही वावर मोठ्या प्रमाणात सर्वच रेल्वेंमध्ये झाला आहे.

सर्व गाड्यांत स्थिती सारखीच

देवगिरी, नंदिग्राम, पनवेल, पुणे, हैदराबाद, सचखंड, ओखा, अजंठा, नरसापूर यासह सर्वच गाड्यांत हीच स्थिती आहे. यामुळे प्रवासी आरक्षण करून जास्तीचे पैसे मोजत आहेत. तरी त्यांना या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.