शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 1128 शाळांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाइन एज्युकेशन सुरू कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा भरणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण द्यावे लागत आहे. ...

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा भरणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण द्यावे लागत आहे. इंग्रजी शाळांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असते. त्यामुळे त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध असते; परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बिकट आहे. ग्रामीण भागात असलेल्या या बहुतांश शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना स्वत:च्या मोबाइलचा डेटा वापरून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत आहे. प्रशासकीय पातळीवरील उदासीनता यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

ग्रामपंचायतींच्या पुढाकाराची गरज

ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून ग्रा.पं. कार्यालयात इंटरनेट जोडणी घेऊन सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ती वापरण्यास देता येऊ शकते. त्यादृष्टिकोनातून ग्रा.पं.नी सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले तर विद्यार्थी व शिक्षकांचा इंटरनेचा प्रश्न सुटू शकतो. शिवाय काही दानशूर व्यक्ती व संस्थांनीही याबाबत पुढाकार घेतल्यास विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.

आमची शाळा दीड वर्षापासून बंद आहे. आमच्या शाळेत इंटरनेट नसल्याने व वडिलांकडे इंटरनेट असलेला मोबाइल नसल्याने शिक्षण घेता येत नाही. सोबतच्या मित्राच्या घरी जाऊन कधीकधी मोबाइलवरून सरांचे शिकविणे ऐकतो; पण समजत नाही.

- संजय काळे, विद्यार्थी

पप्पांचा ऑनलाइन शाळेसाठी मोबाइल वापरतो; परंतु अनेकदा इंटरनेट चालतच नाही. त्यामुळे सरांची शिकवणी नियमित ऐकता येत नाही. खूप वाईट वाटते. आता प्रत्यक्ष शाळा सुरू कधी होते, याची आतुरतेने वाट पाहत आहे. - अमोल शिंदे, विद्यार्थी

आम्ही आमच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण देत आहोत; पण इंटरनेटची गती कमी राहत असल्याने विद्यार्थी व पालकांची ओरड होत असते. त्यामुळे शासनाने महानेटच्या माध्यमातून शाळेला इंटरनेट कनेक्शन दिले, तर सोयीचे होईल. - शरद ठाकर, शिक्षक, केमापूर

कोविडमुळे शाळा बंद आहेत. शाळेत नियमानुसार ५० टक्के उपस्थितीत राहतात. मी स्वतःच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण देत आहे. तरीही शाळेत इंटरनेट कनेक्शन व साधनांची उपलब्धता नसल्याने शिक्षणात व्यत्यय येत आहे. - भुजंग थोरे, शिक्षक, सेलू

जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यास गटाच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. ५ विद्यार्थ्यांचा एक गट असे जिल्ह्यात एकूण १७०० पेक्षा अधिक गट स्थापन करण्यात आले आहेत. याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. -डॉ. सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी