शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

जिल्ह्यात 1128 शाळांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाइन एज्युकेशन सुरू कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा भरणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण द्यावे लागत आहे. ...

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा भरणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण द्यावे लागत आहे. इंग्रजी शाळांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असते. त्यामुळे त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध असते; परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बिकट आहे. ग्रामीण भागात असलेल्या या बहुतांश शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना स्वत:च्या मोबाइलचा डेटा वापरून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत आहे. प्रशासकीय पातळीवरील उदासीनता यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

ग्रामपंचायतींच्या पुढाकाराची गरज

ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून ग्रा.पं. कार्यालयात इंटरनेट जोडणी घेऊन सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ती वापरण्यास देता येऊ शकते. त्यादृष्टिकोनातून ग्रा.पं.नी सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले तर विद्यार्थी व शिक्षकांचा इंटरनेचा प्रश्न सुटू शकतो. शिवाय काही दानशूर व्यक्ती व संस्थांनीही याबाबत पुढाकार घेतल्यास विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.

आमची शाळा दीड वर्षापासून बंद आहे. आमच्या शाळेत इंटरनेट नसल्याने व वडिलांकडे इंटरनेट असलेला मोबाइल नसल्याने शिक्षण घेता येत नाही. सोबतच्या मित्राच्या घरी जाऊन कधीकधी मोबाइलवरून सरांचे शिकविणे ऐकतो; पण समजत नाही.

- संजय काळे, विद्यार्थी

पप्पांचा ऑनलाइन शाळेसाठी मोबाइल वापरतो; परंतु अनेकदा इंटरनेट चालतच नाही. त्यामुळे सरांची शिकवणी नियमित ऐकता येत नाही. खूप वाईट वाटते. आता प्रत्यक्ष शाळा सुरू कधी होते, याची आतुरतेने वाट पाहत आहे. - अमोल शिंदे, विद्यार्थी

आम्ही आमच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण देत आहोत; पण इंटरनेटची गती कमी राहत असल्याने विद्यार्थी व पालकांची ओरड होत असते. त्यामुळे शासनाने महानेटच्या माध्यमातून शाळेला इंटरनेट कनेक्शन दिले, तर सोयीचे होईल. - शरद ठाकर, शिक्षक, केमापूर

कोविडमुळे शाळा बंद आहेत. शाळेत नियमानुसार ५० टक्के उपस्थितीत राहतात. मी स्वतःच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण देत आहे. तरीही शाळेत इंटरनेट कनेक्शन व साधनांची उपलब्धता नसल्याने शिक्षणात व्यत्यय येत आहे. - भुजंग थोरे, शिक्षक, सेलू

जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यास गटाच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. ५ विद्यार्थ्यांचा एक गट असे जिल्ह्यात एकूण १७०० पेक्षा अधिक गट स्थापन करण्यात आले आहेत. याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. -डॉ. सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी