शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

ई-पाससाठी कारणं दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रवेशबंदी केली आहे. १५ एप्रिलपासून ही सीमाबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक कामासाठी ...

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रवेशबंदी केली आहे. १५ एप्रिलपासून ही सीमाबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जाणे आवश्यक असल्यास संबंधितांना पोलीस प्रशासनाकडून ई-पास घ्यावा लागतो. मागील आठ दिवसांपासून येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पास देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडे आतापर्यंत ३ हजार २७४ जणांनी ई-पाससाठी अर्ज केले. त्यातील सर्वाधिक अर्जांमध्ये रुग्णालय तसेच अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याची कारणे दिली आहेत. त्याचप्रमाणे नोकरीवर रुजू होण्यासाठी, लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठीही नागरिकांनी ई-पास घेतले आहेत. मात्र नातेवाईक कोरोनाबाधित असल्याने परजिल्ह्यात भेटण्यासाठी जाणे, मयत नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराच्या कारणास्तव सर्वाधिक अर्जदारांनी ई-पासचा वापर केला. पोलीस प्रशासनाकडून या कागदपत्रांची तपासणी करून ई-पास दिला जातो. आतापर्यंत २ हजार २३० नागरिकांनी ई-पास मिळवित परजिल्ह्यात प्रवास केला आहे.

कोरोना तपासणी प्रमाणपत्र बंधनकारक

पोलीस प्रशासनाकडून ई-पास मिळवण्यासाठी विविध कागदपत्रे ऑनलाइन दाखल करावी लागत आहेत. त्यात अर्जदाराचा आधार क्रमांक, कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या कारणासाठी ई-पास हवा आहे, त्याची खात्री पटविणारे कागदपत्रही लागतात. ज्यात वैद्यकीय प्रमाणपत्र, लग्नपत्रिका, नोकरीवर रुजू व्हायचे असेल तर त्यासंदर्भातील आदेश आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

दोन तासात मिळतो पास

ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराला टोकन आयडी दिला जातो. हा टोकन आयडी जनरेट झाल्यानंतर अर्ज वैध असेल तर दोन तासातच अर्जदाराला ई-पास मंजूर केला जातो. सुरुवातीला पास देण्यासाठी विलंब लागत होता; परंतु आता दोन तासातच पास मंजूर केला जातो.

पाससाठी तीच ती कारणे

ई-पास मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या अर्जदारांनी एकच एक कारणे दिली आहेत. त्यात वैद्यकीय कारण, कोरोनाबाधित रुग्णांना भेट, कोरोनाने मृत्यू पावलेल्या नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे या कारणांचा समावेश आहे.

ई पाससाठी आलेले अर्ज : ३२७४

आतापर्यंत दिलेले पास : २२२३

प्रलंबित अर्ज : ८४

रद्द केलेले अर्ज : ९६७