शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ई-पाससाठी कारणं दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रवेशबंदी केली आहे. १५ एप्रिलपासून ही सीमाबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक कामासाठी ...

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रवेशबंदी केली आहे. १५ एप्रिलपासून ही सीमाबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जाणे आवश्यक असल्यास संबंधितांना पोलीस प्रशासनाकडून ई-पास घ्यावा लागतो. मागील आठ दिवसांपासून येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पास देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडे आतापर्यंत ३ हजार २७४ जणांनी ई-पाससाठी अर्ज केले. त्यातील सर्वाधिक अर्जांमध्ये रुग्णालय तसेच अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याची कारणे दिली आहेत. त्याचप्रमाणे नोकरीवर रुजू होण्यासाठी, लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठीही नागरिकांनी ई-पास घेतले आहेत. मात्र नातेवाईक कोरोनाबाधित असल्याने परजिल्ह्यात भेटण्यासाठी जाणे, मयत नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराच्या कारणास्तव सर्वाधिक अर्जदारांनी ई-पासचा वापर केला. पोलीस प्रशासनाकडून या कागदपत्रांची तपासणी करून ई-पास दिला जातो. आतापर्यंत २ हजार २३० नागरिकांनी ई-पास मिळवित परजिल्ह्यात प्रवास केला आहे.

कोरोना तपासणी प्रमाणपत्र बंधनकारक

पोलीस प्रशासनाकडून ई-पास मिळवण्यासाठी विविध कागदपत्रे ऑनलाइन दाखल करावी लागत आहेत. त्यात अर्जदाराचा आधार क्रमांक, कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या कारणासाठी ई-पास हवा आहे, त्याची खात्री पटविणारे कागदपत्रही लागतात. ज्यात वैद्यकीय प्रमाणपत्र, लग्नपत्रिका, नोकरीवर रुजू व्हायचे असेल तर त्यासंदर्भातील आदेश आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

दोन तासात मिळतो पास

ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराला टोकन आयडी दिला जातो. हा टोकन आयडी जनरेट झाल्यानंतर अर्ज वैध असेल तर दोन तासातच अर्जदाराला ई-पास मंजूर केला जातो. सुरुवातीला पास देण्यासाठी विलंब लागत होता; परंतु आता दोन तासातच पास मंजूर केला जातो.

पाससाठी तीच ती कारणे

ई-पास मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या अर्जदारांनी एकच एक कारणे दिली आहेत. त्यात वैद्यकीय कारण, कोरोनाबाधित रुग्णांना भेट, कोरोनाने मृत्यू पावलेल्या नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे या कारणांचा समावेश आहे.

ई पाससाठी आलेले अर्ज : ३२७४

आतापर्यंत दिलेले पास : २२२३

प्रलंबित अर्ज : ८४

रद्द केलेले अर्ज : ९६७