शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला

By मारोती जुंबडे | Updated: June 2, 2023 17:33 IST

उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९०.४५ टक्के एवढा आहे. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा होता. 

परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला असून त्यात परभणी जिल्ह्याचा निकाल ९०.४५ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल हा ५ टक्क्यांनी घसरला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये परभणी जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. बीड जिल्ह्याचा सर्वाधिक ९६. २४ टक्के निकाल असून विभागात प्रथम स्थानावर आहे.

२ जून रोजी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परभणी जिल्ह्यातून २७ हजार ५८४ विद्यार्थांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २७ हजार २०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात ७४९६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ८ हजार ६०१, द्वितीय श्रेणीत ६५८६, तृतीय श्रेणीत १९२८ असे एकूण २४ हजार ६११ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९०.४५ टक्के एवढा आहे. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा होता. 

तालुक्याच्या निकालात गंगाखेड तालुक्याने बाजी मारली आहे. या तालुक्याचा निकाल ९२.६० टक्के एवढा लागला आहे. त्या पाठोपाठ पूर्णा तालुका ९१.६५, जिंतूर ९१.२५,सोनपेठ ९०.८६, परभणी ९०.८४, पालम ८७.८२, पाथरी ८८.९३, मानवत ८७.३४ तर सेलू ८७.४८ एवढा निकाल लागला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात मानवत तालुक्याचा निकाल मात्र सर्वात कमी ८७.३४ टक्के एवढा लागला आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घटली आहे. विशेष म्हणजे उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये विशेष प्राविण्यासह तसेच प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी असल्याचे दिसून येत आहे.गतवर्षीच्या तुलनेत निकाल पाच टक्क्यांनी घटलामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये परभणी जिल्हा छत्रपती संभाजी नगर विभागात चौथ्या स्थानावर अबाधित राहिला असला तरी निकाल मात्र पाच टक्क्यांनी घटला आहे. २०२२-२३ या वर्षीचा निकाल हा ९०.४५ टक्के एवढा लागला आहे. तर दुसरीकडे गतवर्षी परभणी जिल्ह्याचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा लागला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा जिल्ह्याचा निकाल हा ५ टक्क्यांनी घट झाली असल्याचे दिसून येत आहे.यंदाही मुलीच आघाडीवरदहावी, बारावी परीक्षेच्या निकालात मागील अनेक वर्षापासून मुलांच्या तुलनेत मुलीचे यश अधिक असल्याचे सिद्ध होत आहे. यावर्षी देखील हीच पुनरावृत्ती झाली. जिल्ह्यात १२ हजार ३८८ मुली परीक्षेसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी ११ हजार ६१५ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्याची टक्केवारी ही ९३.७६ टक्के एवढी आहे. तर दुसरीकडे १४ हजार ८२० मुले परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी १२ हजार ९९६ मुलांनी परीक्षा दिली. त्याची टक्केवारी ही ८७.६९ टक्के एवढी आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून दहावी व बारावीच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलीच प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरत असल्याचे दिसून येत आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीSSC Resultदहावीचा निकाल