शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

टेक्नोसॅव्ही जमाना! परभणीत महिन्याभरात ८ हजार स्मार्टफोनची विक्री, ९ कोटींची उलाढाल

By राजन मगरुळकर | Updated: August 18, 2023 15:54 IST

जवळपास एक हजारापासून ते दीड लाखापर्यंतच्या किमतीचे मोबाइल विविध ठिकाणी उपलब्ध आहेत.

परभणी : महागडे स्मार्ट फोन खरेदी करण्याचे फॅड आता वाढत आहे. त्यातही महाविद्यालयीन युवकांचा वाटा यात अधिक आहे. शहरात सध्या १५ पेक्षा अधिक मोबाइल कंपन्यांचे वेगवेगळे हँडसेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या हँडसेटच्या विक्रीतून जिल्ह्यात साधारणपणे दररोज ३० लाखांची उलाढाल होत आहे. महिन्याकाठी साधारणपणे आठ हजारांहून अधिक हँडसेटची खरेदी होत आहे. यामुळे टेक्नोसॅव्हीच्या जमान्यात जिल्ह्यातील व्यापारी वर्गात नऊ कोटी खजिन्याची उलाढाल खरेदी-विक्रीच्या माध्यमातून होत आहे.

शहरात जागोजागी मोबाइल मार्केट निर्माण झाली आहेत. मुख्य रस्ते, चौक आणि व्यापारी संकुलात विविध कंपन्यांच्या मोबाइल विक्रीची मोठी ३० ते ४० दुकाने आहेत. याशिवाय मोबाइलसाठीची ॲक्सेसरीज आणि इतर साहित्यविक्रीची दुकानेही थाटली आहेत. जवळपास एक हजारापासून ते दीड लाखापर्यंतच्या किमतीचे मोबाइल विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. यापैकी अँड्रॉइड व अधिक मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा असलेल्या मोबाइलना तरुणाईची मोठी पसंती आहे. मार्केटमधील ४० मोबाइल दुकानांवर दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारच्या २०० ते २५० मोबाइलची विक्री होते. या माध्यमातून ३० लाखांपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल दररोज होत असते. यापूर्वी की-पॅडचे मोबाइल वापरण्याची सवय अनेकांना होती. मात्र आता टच स्क्रीन व अँड्रॉइड मोबाइलना अधिक पसंती मिळत आहे.

नवीन तंत्रज्ञानाला पसंतीम्युझिक सिस्टम, टच स्क्रीन, नेट प्रोसेसिंग, कलर व्हरायटीज यांकडे तरुणांचा ओढा अधिक आहे. आता नवीन मार्केटमध्ये येणाऱ्या मोबाइलमध्ये एचडी गुणवत्तेबरोबरच वॉटरप्रूफ या सुविधादेखील आहेत. त्याचबरोबर पाच इंच लांबीचा १३ मेगापिक्सल कॅमेरा, विंडोज फोन असलेले मोबाइलदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ऑनलाइन खरेदीमुळे उलाढालीवर परिणाम  बदलत्या काळानुसार आता बाजारपेठेतील खरेदीपेक्षा अनेक जण ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या खरेदी-विक्रीकडे वळले आहेत. यातच सण, उत्सव तसेच वर्षभरातून वेगवेगळ्या कालावधीमध्ये मिळणारी ऑनलाईन खरेदीवरील सूट लक्षात घेता घरातील दैनंदिन उपयोगी पडणाऱ्या वस्तूंपासून ते मोबाईल, लॅपटॉप सोबतच विविध वाहनांच्या खरेदी सुद्धा ऑनलाइन केल्या जातात. याचे प्रमाण शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्येही वाढले आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या फिचर्सचा समावेश असलेले मोबाईल खरेदी करताना अनेक जण ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. मिळणाऱ्या सूट आणि घरपोच सुविधामुळे ही खरेदी वाढली. परिणामी, बाजारपेठेत दुकानांमध्ये होणाऱ्या उलाढालीला याचा फटका बसत आहे.

ई-वेस्टच्या समस्येत पडतेय भरकोरोनापासून अँन्डराँईड मोबाईल खरेदीचे प्रमाण वाढले आहे. जो-तो आपल्याला हव्या असलेल्या फिचरच्या मोबाईलची खरेदी करत आहे. यात घरोघरी प्रति व्यक्ती एक मोबाईल असे समीकरणच बनले आहे. त्यात साधारण दोन ते तीन वर्ष एक मोबाईल वापरला की तो पुन्हा बदलला जातो. त्यामुळे अशा प्रकारे जुने मोबाईल अडगळीत पडत आहेत. यातूनच ई-वेस्टचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल, टँब, लँपटाँप, संगणक आणि त्यांच्याशी निगडीत असलेले साहित्य यांची भर पडत आहे. हा ई-कचरा पूर्नवापराविना तसाच ठेवला जात आहे.

किमान किंमत : एक हजारकमाल किंमत : दीड लाख व त्याहून अधिक.दररोजची विक्री : २०० ते २५०शहरातील दूकाने : ३० ते ४०जिल्ह्यातील मोठी दूकाने : ८०

येथून केली जाते खरेदीमुंबई, पूणे, बेंगलोर, दिल्ली यासह थेट कंपनीच्या वतीने शहरात हे मोबाईल विक्रीसाठी पाठविले जातात.

टॅग्स :Mobileमोबाइलparabhaniपरभणी