शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

टेक्नोसॅव्ही जमाना! परभणीत महिन्याभरात ८ हजार स्मार्टफोनची विक्री, ९ कोटींची उलाढाल

By राजन मगरुळकर | Updated: August 18, 2023 15:54 IST

जवळपास एक हजारापासून ते दीड लाखापर्यंतच्या किमतीचे मोबाइल विविध ठिकाणी उपलब्ध आहेत.

परभणी : महागडे स्मार्ट फोन खरेदी करण्याचे फॅड आता वाढत आहे. त्यातही महाविद्यालयीन युवकांचा वाटा यात अधिक आहे. शहरात सध्या १५ पेक्षा अधिक मोबाइल कंपन्यांचे वेगवेगळे हँडसेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या हँडसेटच्या विक्रीतून जिल्ह्यात साधारणपणे दररोज ३० लाखांची उलाढाल होत आहे. महिन्याकाठी साधारणपणे आठ हजारांहून अधिक हँडसेटची खरेदी होत आहे. यामुळे टेक्नोसॅव्हीच्या जमान्यात जिल्ह्यातील व्यापारी वर्गात नऊ कोटी खजिन्याची उलाढाल खरेदी-विक्रीच्या माध्यमातून होत आहे.

शहरात जागोजागी मोबाइल मार्केट निर्माण झाली आहेत. मुख्य रस्ते, चौक आणि व्यापारी संकुलात विविध कंपन्यांच्या मोबाइल विक्रीची मोठी ३० ते ४० दुकाने आहेत. याशिवाय मोबाइलसाठीची ॲक्सेसरीज आणि इतर साहित्यविक्रीची दुकानेही थाटली आहेत. जवळपास एक हजारापासून ते दीड लाखापर्यंतच्या किमतीचे मोबाइल विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. यापैकी अँड्रॉइड व अधिक मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा असलेल्या मोबाइलना तरुणाईची मोठी पसंती आहे. मार्केटमधील ४० मोबाइल दुकानांवर दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारच्या २०० ते २५० मोबाइलची विक्री होते. या माध्यमातून ३० लाखांपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल दररोज होत असते. यापूर्वी की-पॅडचे मोबाइल वापरण्याची सवय अनेकांना होती. मात्र आता टच स्क्रीन व अँड्रॉइड मोबाइलना अधिक पसंती मिळत आहे.

नवीन तंत्रज्ञानाला पसंतीम्युझिक सिस्टम, टच स्क्रीन, नेट प्रोसेसिंग, कलर व्हरायटीज यांकडे तरुणांचा ओढा अधिक आहे. आता नवीन मार्केटमध्ये येणाऱ्या मोबाइलमध्ये एचडी गुणवत्तेबरोबरच वॉटरप्रूफ या सुविधादेखील आहेत. त्याचबरोबर पाच इंच लांबीचा १३ मेगापिक्सल कॅमेरा, विंडोज फोन असलेले मोबाइलदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ऑनलाइन खरेदीमुळे उलाढालीवर परिणाम  बदलत्या काळानुसार आता बाजारपेठेतील खरेदीपेक्षा अनेक जण ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या खरेदी-विक्रीकडे वळले आहेत. यातच सण, उत्सव तसेच वर्षभरातून वेगवेगळ्या कालावधीमध्ये मिळणारी ऑनलाईन खरेदीवरील सूट लक्षात घेता घरातील दैनंदिन उपयोगी पडणाऱ्या वस्तूंपासून ते मोबाईल, लॅपटॉप सोबतच विविध वाहनांच्या खरेदी सुद्धा ऑनलाइन केल्या जातात. याचे प्रमाण शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्येही वाढले आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या फिचर्सचा समावेश असलेले मोबाईल खरेदी करताना अनेक जण ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. मिळणाऱ्या सूट आणि घरपोच सुविधामुळे ही खरेदी वाढली. परिणामी, बाजारपेठेत दुकानांमध्ये होणाऱ्या उलाढालीला याचा फटका बसत आहे.

ई-वेस्टच्या समस्येत पडतेय भरकोरोनापासून अँन्डराँईड मोबाईल खरेदीचे प्रमाण वाढले आहे. जो-तो आपल्याला हव्या असलेल्या फिचरच्या मोबाईलची खरेदी करत आहे. यात घरोघरी प्रति व्यक्ती एक मोबाईल असे समीकरणच बनले आहे. त्यात साधारण दोन ते तीन वर्ष एक मोबाईल वापरला की तो पुन्हा बदलला जातो. त्यामुळे अशा प्रकारे जुने मोबाईल अडगळीत पडत आहेत. यातूनच ई-वेस्टचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल, टँब, लँपटाँप, संगणक आणि त्यांच्याशी निगडीत असलेले साहित्य यांची भर पडत आहे. हा ई-कचरा पूर्नवापराविना तसाच ठेवला जात आहे.

किमान किंमत : एक हजारकमाल किंमत : दीड लाख व त्याहून अधिक.दररोजची विक्री : २०० ते २५०शहरातील दूकाने : ३० ते ४०जिल्ह्यातील मोठी दूकाने : ८०

येथून केली जाते खरेदीमुंबई, पूणे, बेंगलोर, दिल्ली यासह थेट कंपनीच्या वतीने शहरात हे मोबाईल विक्रीसाठी पाठविले जातात.

टॅग्स :Mobileमोबाइलparabhaniपरभणी