शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

६८ हजार कुटुंबीयांना नळाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात जलजीवन मिशन अभियान राबविण्यात आले असून, ६८ हजार कुटुंबीयांना ...

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात जलजीवन मिशन अभियान राबविण्यात आले असून, ६८ हजार कुटुंबीयांना नळजोडणी देत नळाचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. नळ जोडणी देण्याच्या या कामात परभणी जिल्ह्याने मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. या अभियानानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेला नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट दिले होते. ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पिण्यायोग्य शुद्ध पाणी नळाद्वारे पुरविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे. २०२०-२१ या वर्षांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत परभणी जिल्ह्याला ग्रामीण भागासाठी ६८ हजार ६०४ नळ जोडणी देण्याचे एवढे उद्दिष्ट निश्चित केले होते. जि.प.ने डिसेंबर महिन्यातच १०० नळ जोडणी देऊन हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

‘हर घर नल से जल’ या योजनेद्वारे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची मोहीम केंद्र शासनामार्फत राबविली जात आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात शासकीय योजनांद्वारे व खासगी बोरवेलद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगामार्फत ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीतून नळ जोडणीची आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली आहेत. वैयक्तिक नळ जोडणीच्या या मोहिमेमध्ये स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. पवार, उपअभियंता गंगाधर यंबडवार, उपअभियंता माथेकर आदींसह गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.