शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

टँकर मंजुरीचे अधिकार आता उपविभागीय अधिकाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST

परभणी जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोनावरील उपाययोजना करण्यात ...

परभणी जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोनावरील उपाययोजना करण्यात व्यस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आता पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे मागणी केलेल्या गावांना पाण्याचे टँकर सुरू करणे आवश्यक आहे. यापूर्वी हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. आता जिल्हाधिकारी कोरोना उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने ३० जूनपर्यंत टँकर सुरू करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

दरम्यान, पाणी टंचाई निवारणाच्या कामासाठी तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व विंधनविहिरी विशेष दुरुस्ती योजना आदींच्या प्रस्तावांना भौतिक व आर्थिक निकषानुसार ३० मार्चपर्यंतच मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु कोरोनाची स्थिती लक्षात घेता, त्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरी सदरील कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही यासंदर्भात राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.