शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

ग्रामपंचायतीच्या राजकारणात तरुणांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:16 IST

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांविषयी चर्चा होऊ लागली आहे. राजकारणाचा कोणताही ...

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांविषयी चर्चा होऊ लागली आहे. राजकारणाचा कोणताही वारसा नसलेले व नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या काही उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळविला आहे. पालम तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत विद्या भास्कर लांडे या २२ वर्षाच्या विवाहित तरुणीने बी.एस्सी.चे शिक्षण घेतल्यानंतर निवडणूक लढविली व त्यात बिनविरोध निवड झाली. गावाच्या सर्वांगिन विकासासाठी काम करण्याचा विद्याचा निर्धार असून सुशिक्षत बेरोजगारांसाठी लघु उद्योग आणण्यासह शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्याने सांगितले. सेलू तालुक्यातील खेर्डा येथील प्रियंका विकास आठवले या २४ वर्षीय तरुणीनेही आरक्षित जागेवरुन निवडणूक लढविली आणि त्यात यश संपादन केले. गावातील तरुणांसाठी वाचनालय स्थापन करुन त्यांना रोजगाराभिमूख माहिती उपलब्ध करुन देण्याचा प्रियंकाचा मानस आहे. निरवाडी येथील अनिल वांढेकर या २४ या तरुणानेही या निवडणुकीत विजय मिळविला. अनिलचे चुलते यापूर्वी राजकारणात होते. त्यांच्याकडून राजकाराणाचे धडे घेऊन आता अनिलला गावातील मुलभूत समस्या सोडवायच्या आहेत.

पाथरी तालुक्यातील गौंडगाव येथील प्रमोद नारायण हारकळ या २१ वर्षीय तरुणानेही निवडणुकीत विजय मिळविला. प्रमोदला गावात स्वच्छता अभियान राबवून शुद्ध पाणीपुरवठा ग्रामस्थांना द्यायचा आहे. गावात वाचनालय, व्यायामशाळा आदींची उभारणीही करण्याचा त्याचा मानस आहे. बाभळगाव येथील भूवन सुनील नाईकवाडे या २४ वर्षीय तरुणानेही विजय मिळविला. त्याला गावात प्रत्येक रस्त्यावर वृक्षारोपण करुन गाव हरित करायचे आहे. शिवाय हगणदारी मुक्त गाव करुन तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यायचा आहे. किन्होळा खु. येथील शुभम राधाकिशन कणसे या २२ वर्षीय तरुणानेही निवडणुकीत विजय मिळविला. त्यालाही गावात आरोग्य व शैक्षिणक सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या आहेत. मानवत तालुक्यातील किन्होळ बु. येथील माधुरी मदनराव कदम या २५वर्षीय तरुणीने विजय मिळविला. माधुरीचे आजोबा मुंजाजी भाले पाटील पाथरीचे नगराध्यक्ष होते. ते १५ वर्षे गावचे सरपंच होते. त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेऊन माधुरीने गावाच्या विकासात आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

बचतगटातून ग्रा.पं. राजकारणात

जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील वंदना महेंद्र लाटे या २५ वर्षीय तरुणीने बचतगटाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. गावाचा विकास करण्याच्या हेतुने ग्रामपंचायत निवडणूक लढविली आणि त्यात विजय संपादन केला. गावामध्ये प्रत्येक घरी शौचालय उभारण्याचा वंदनाचा मानस आहे. याशिवाय गावात दुग्धपालन, कुकुटपालन आदी रोजगार देणारे व्यवसाय सुरु करण्याची त्यांची ईच्छा आहे.

सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील बाबासाहेब हरिभाऊ ताल्डे, डिघोळ येथील वैभव विजय खंदारे यांनीही या निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यांनाही गावाचा विकास करायचा आहे.