शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

ग्रामपंचायतीच्या राजकारणात तरुणांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:16 IST

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांविषयी चर्चा होऊ लागली आहे. राजकारणाचा कोणताही ...

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांविषयी चर्चा होऊ लागली आहे. राजकारणाचा कोणताही वारसा नसलेले व नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या काही उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळविला आहे. पालम तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत विद्या भास्कर लांडे या २२ वर्षाच्या विवाहित तरुणीने बी.एस्सी.चे शिक्षण घेतल्यानंतर निवडणूक लढविली व त्यात बिनविरोध निवड झाली. गावाच्या सर्वांगिन विकासासाठी काम करण्याचा विद्याचा निर्धार असून सुशिक्षत बेरोजगारांसाठी लघु उद्योग आणण्यासह शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्याने सांगितले. सेलू तालुक्यातील खेर्डा येथील प्रियंका विकास आठवले या २४ वर्षीय तरुणीनेही आरक्षित जागेवरुन निवडणूक लढविली आणि त्यात यश संपादन केले. गावातील तरुणांसाठी वाचनालय स्थापन करुन त्यांना रोजगाराभिमूख माहिती उपलब्ध करुन देण्याचा प्रियंकाचा मानस आहे. निरवाडी येथील अनिल वांढेकर या २४ या तरुणानेही या निवडणुकीत विजय मिळविला. अनिलचे चुलते यापूर्वी राजकारणात होते. त्यांच्याकडून राजकाराणाचे धडे घेऊन आता अनिलला गावातील मुलभूत समस्या सोडवायच्या आहेत.

पाथरी तालुक्यातील गौंडगाव येथील प्रमोद नारायण हारकळ या २१ वर्षीय तरुणानेही निवडणुकीत विजय मिळविला. प्रमोदला गावात स्वच्छता अभियान राबवून शुद्ध पाणीपुरवठा ग्रामस्थांना द्यायचा आहे. गावात वाचनालय, व्यायामशाळा आदींची उभारणीही करण्याचा त्याचा मानस आहे. बाभळगाव येथील भूवन सुनील नाईकवाडे या २४ वर्षीय तरुणानेही विजय मिळविला. त्याला गावात प्रत्येक रस्त्यावर वृक्षारोपण करुन गाव हरित करायचे आहे. शिवाय हगणदारी मुक्त गाव करुन तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यायचा आहे. किन्होळा खु. येथील शुभम राधाकिशन कणसे या २२ वर्षीय तरुणानेही निवडणुकीत विजय मिळविला. त्यालाही गावात आरोग्य व शैक्षिणक सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या आहेत. मानवत तालुक्यातील किन्होळ बु. येथील माधुरी मदनराव कदम या २५वर्षीय तरुणीने विजय मिळविला. माधुरीचे आजोबा मुंजाजी भाले पाटील पाथरीचे नगराध्यक्ष होते. ते १५ वर्षे गावचे सरपंच होते. त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेऊन माधुरीने गावाच्या विकासात आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

बचतगटातून ग्रा.पं. राजकारणात

जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील वंदना महेंद्र लाटे या २५ वर्षीय तरुणीने बचतगटाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. गावाचा विकास करण्याच्या हेतुने ग्रामपंचायत निवडणूक लढविली आणि त्यात विजय संपादन केला. गावामध्ये प्रत्येक घरी शौचालय उभारण्याचा वंदनाचा मानस आहे. याशिवाय गावात दुग्धपालन, कुकुटपालन आदी रोजगार देणारे व्यवसाय सुरु करण्याची त्यांची ईच्छा आहे.

सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील बाबासाहेब हरिभाऊ ताल्डे, डिघोळ येथील वैभव विजय खंदारे यांनीही या निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यांनाही गावाचा विकास करायचा आहे.