शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

३ हजार हेक्टरवरील उसाला मिळाले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

पाथरी - जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेल्या पहिल्या पाणी पाळीत ६ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन ...

पाथरी - जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेल्या पहिल्या पाणी पाळीत ६ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला पाणी मिळाले. २७ नोव्हेंबरपासून सोडण्यात आलेले पहिले आवर्तन १४ डिसेंबर रोजी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

पैठण येथील जायकवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी तीन पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनाचे पाणी २७ नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यात दाखल झाले होते. पाथरी जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. ६ अंतर्गत वितरीका क्र. ४७ ते ६३ मध्ये रब्बी हंगामातील पिकांना पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. या पाण्याच्या माध्यमातून पाथरी आणि मानवत तालुक्यातील जवळपास ६ हजार हेक्टर शेती सिंचन करण्यात आले आहे. यावर्षी रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकांना जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यास अधिक भर दिला आहे. एकूण झालेल्या सिंचन क्षेत्रापैकी ५० टक्के म्हणजेच ३ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला फायदा झाला आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरबरा आणि उभ्या तुरीच्या पिकाला जायकवाडीच्या पाण्याचा लाभ झाला आहे.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेले पहिले आवर्तन बंद करण्यात आले आहे. आता दुसरे आवर्तन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात येणार आहे.

-डी. बी. खारकर, उपअभियंता, जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. ६ पाथरी