शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार हेक्टरवरील उसाला मिळाले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

पाथरी - जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेल्या पहिल्या पाणी पाळीत ६ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन ...

पाथरी - जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेल्या पहिल्या पाणी पाळीत ६ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला पाणी मिळाले. २७ नोव्हेंबरपासून सोडण्यात आलेले पहिले आवर्तन १४ डिसेंबर रोजी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

पैठण येथील जायकवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी तीन पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनाचे पाणी २७ नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यात दाखल झाले होते. पाथरी जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. ६ अंतर्गत वितरीका क्र. ४७ ते ६३ मध्ये रब्बी हंगामातील पिकांना पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. या पाण्याच्या माध्यमातून पाथरी आणि मानवत तालुक्यातील जवळपास ६ हजार हेक्टर शेती सिंचन करण्यात आले आहे. यावर्षी रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकांना जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यास अधिक भर दिला आहे. एकूण झालेल्या सिंचन क्षेत्रापैकी ५० टक्के म्हणजेच ३ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला फायदा झाला आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरबरा आणि उभ्या तुरीच्या पिकाला जायकवाडीच्या पाण्याचा लाभ झाला आहे.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेले पहिले आवर्तन बंद करण्यात आले आहे. आता दुसरे आवर्तन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात येणार आहे.

-डी. बी. खारकर, उपअभियंता, जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. ६ पाथरी