शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
2
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
3
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
4
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
5
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
6
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
7
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
10
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
11
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
12
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
13
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
14
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
15
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
17
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
18
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
19
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
20
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार

३ हजार हेक्टरवरील उसाला मिळाले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

पाथरी - जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेल्या पहिल्या पाणी पाळीत ६ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन ...

पाथरी - जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेल्या पहिल्या पाणी पाळीत ६ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला पाणी मिळाले. २७ नोव्हेंबरपासून सोडण्यात आलेले पहिले आवर्तन १४ डिसेंबर रोजी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

पैठण येथील जायकवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी तीन पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनाचे पाणी २७ नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यात दाखल झाले होते. पाथरी जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. ६ अंतर्गत वितरीका क्र. ४७ ते ६३ मध्ये रब्बी हंगामातील पिकांना पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. या पाण्याच्या माध्यमातून पाथरी आणि मानवत तालुक्यातील जवळपास ६ हजार हेक्टर शेती सिंचन करण्यात आले आहे. यावर्षी रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकांना जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यास अधिक भर दिला आहे. एकूण झालेल्या सिंचन क्षेत्रापैकी ५० टक्के म्हणजेच ३ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला फायदा झाला आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरबरा आणि उभ्या तुरीच्या पिकाला जायकवाडीच्या पाण्याचा लाभ झाला आहे.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेले पहिले आवर्तन बंद करण्यात आले आहे. आता दुसरे आवर्तन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात येणार आहे.

-डी. बी. खारकर, उपअभियंता, जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. ६ पाथरी