शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

३६ ऐतिहासिक स्थळांचा गटाकडून अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:19 IST

परभणी : जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे आणि त्यांचे पौराणिक महत्त्व भावी पिढीला व जिल्ह्याबाहेरील नागरिकांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी ...

परभणी : जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे आणि त्यांचे पौराणिक महत्त्व भावी पिढीला व जिल्ह्याबाहेरील नागरिकांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक स्थळांच्या माहितीचे संकलन सुरू झाले असून, आतापर्यंत अभ्यास गटातील तज्ज्ञांनी ३६ स्थळांना भेटी देऊन माहिती संकलित केली आहे.

जिल्ह्यात गावा-गावांत पौराणिक मंदिरे, पुरातन वास्तू, शिल्प आदी ऐतिहासिक वारसा उपलब्ध आहे. मात्र, या मंदिर आणि शिल्पांची शास्त्रशुद्ध माहिती नागरिकांसमोर एकत्रितरीत्या उपलब्ध नाही. जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व इतरांना पटवून देण्यासाठी आणि हा वारसा जतन करीत त्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी महिनाभरापूर्वी इतिहासतज्ज्ञांची बैठक घेऊन या प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर एका अभ्यास गटाची नियुक्तीही या कामी करण्यात आली. चारठाणा येथील हेमाडपंथी मंदिरे, धारासूर येथील गुप्तेश्वराचे मंदिर, शेळगाव येथील महाविष्णूचे मंदिर यासह अनेक पौराणिक स्थळांना अभ्यासगटातील सदस्य भेटी देत आहेत. सुरुवातीला एकूण ४४ पौराणिक स्थळे निवडण्यात आली असून, त्यातील ३६ स्थळांची माहिती संकलित करण्यात आली आहे. गटातील सदस्य गावात पोहोचल्यानंतर ग्रामस्थांना या पौराणिक स्थळांसंदर्भात एक प्रश्नावली देतात. त्यात स्थळांची माहिती संकलित केली जाते. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांकडून आख्यायिका, स्थळांचे महात्म्ये संकलित केले जाते. पहिल्या टप्प्यात ही माहिती पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर आवश्यकता भासल्यास दुसऱ्यांदा भेट देऊन आणखी पूरक माहिती संकलित केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये संकलित केलेल्या माहितीचे लिखाण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक छायाचित्रकारांकडून या स्थळांचे छायाचित्र मिळविले जाणार आहेत. तसेच व्हिडिओ चित्रीकरणही केले जाणार आहे. परभणी हेरिटेज नावाचे पुस्तक या प्रकल्पातून प्रकाशित केले जाणार असून, स्वतंत्र संकेतस्थळही निर्माण करण्यात येणार आहे.

सहा ग्रंथांचे डिजिटलायझेशन

नागरिकांकडे उपलब्ध असलेले पौराणिक व दुर्मिळ ग्रंथ प्रशासनाला उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले होते. त्यानुसार सहा ग्रंथ प्रशासनाला प्राप्त झाले असून, त्याचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. जुन्या ग्रंथांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.