शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

१५ गावांतील विद्यार्थिनींची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

बोरी : राज्य शासनाच्या वतीने अनलॉकमध्ये दहावी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद ...

बोरी : राज्य शासनाच्या वतीने अनलॉकमध्ये दहावी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेली मानव विकास बसची सेवा अद्यापही एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरातील १५ गावांतील विद्यार्थिनींना गैरसोयींचा सामना करत शाळा गाठावी लागत आहे.

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालय, साईकृपा विद्यायल, ज्ञानोपासक महाविद्यायल, जि.प. शाळा, बसवेश्वर महाविद्यालय या ठिकाणी कौसडी, कान्हड, पिंपळगाव, मारवाडी, कोक, माक, जवळा, वाघी, मालेगाव, नांदगाव, बोर्डी, डोहरा, रोहिला पिंप्री, वरणा व निवळी आदी १५ गावांतील विद्यार्थिनी शिक्षण घेतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर एसटी महामंडळानेही आपली सेवा बंद केली होती. मात्र आता अनलॉकमध्ये एसटी महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्याचबरोबर आता आठ दिवसांपासून राज्य शासनाच्या वतीने दहावी, बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या वतीने जिंतूर आगारातून अद्यापही मानव विकासची बससेवा अद्याापही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे १५ गावांतील विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालये गाठण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.