शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावांतील विद्यार्थिनींची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

बोरी : राज्य शासनाच्या वतीने अनलॉकमध्ये दहावी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद ...

बोरी : राज्य शासनाच्या वतीने अनलॉकमध्ये दहावी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेली मानव विकास बसची सेवा अद्यापही एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरातील १५ गावांतील विद्यार्थिनींना गैरसोयींचा सामना करत शाळा गाठावी लागत आहे.

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालय, साईकृपा विद्यायल, ज्ञानोपासक महाविद्यायल, जि.प. शाळा, बसवेश्वर महाविद्यालय या ठिकाणी कौसडी, कान्हड, पिंपळगाव, मारवाडी, कोक, माक, जवळा, वाघी, मालेगाव, नांदगाव, बोर्डी, डोहरा, रोहिला पिंप्री, वरणा व निवळी आदी १५ गावांतील विद्यार्थिनी शिक्षण घेतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर एसटी महामंडळानेही आपली सेवा बंद केली होती. मात्र आता अनलॉकमध्ये एसटी महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्याचबरोबर आता आठ दिवसांपासून राज्य शासनाच्या वतीने दहावी, बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या वतीने जिंतूर आगारातून अद्यापही मानव विकासची बससेवा अद्याापही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे १५ गावांतील विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालये गाठण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.