शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

परभणी तालुक्यातील स्थिती:अकरा गावांमध्ये केले जलस्त्रोतांचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:36 IST

तालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती कार्यालयाकडे जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी १९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी तहसील कार्यालयाने ११ गावांतील प्रस्तावांना मुंजरी देऊन पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामध्ये गोविंदपूरवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :तालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती कार्यालयाकडे जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी १९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी तहसील कार्यालयाने ११ गावांतील प्रस्तावांना मुंजरी देऊन पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामध्ये गोविंदपूरवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.परभणी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यातच परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील नदी, नाले, विहीर, बोअर या जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावू लागली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील जलस्त्रोतांनी तळ गाठला. त्यातच दुधना, पूर्णा या नदीचे पात्रही कोरडेठाक पडले आहे. परिणामी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहीरींची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दोन ते तीन कि.मी.ची पायपीट करुन शेतातील जलस्त्रोतातून पाणी आणावे लागत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यातील पाणीटंचाई ओळखून तालुक्यातील किन्होळा, पिंपळगाव स.मि., आर्वी, काष्टगाव, पाथरा, नांदापूर, समसापूर, ब्रह्मपुरीतर्फे पेडगाव, वाडी दमई, पेडगाव, बाभूळगाव, गोविंदपूर, सारंगपूर, मोहपुरी, पिंपळा या गावांतील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती कार्यालयाकडे १९ प्रस्ताव जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी दाखल केले होते. पंचायत समितीने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. तहसील कार्यालयाने १९ प्रस्तावांपैकी ११ प्रस्तावांना मंजुरी देत विहीर व बोअरचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरु आहे. तर गोविंदपूर येथे टँकरने पाणी पुरवठ्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा ग्रामस्थांना सहन कराव्यात लागत आहेत.मंजुरीसाठी लागतोय : एक महिन्याचा कालावधीपरभणी तालुक्यातील १३१ गावांपैकी १४ गावांनी १९ जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल केले; परंतु, प्रस्ताव मंजुरीसाठी महिनाभराचा कालावधी लागत असल्याचे दिसून येत आहे. किन्होळा येथील ग्रामपंचायतीने ५ नोव्हेंबर २०१८ रोजी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन १३ नोव्हेंबर २०१८ रोजी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला; परंतु, त्यानंतर पंचायत समितीने १ डिसेंबर २०१८ रोजी आलेला प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दाखल केला.४तहसील कार्यालयाने २९ डिसेंबर २०१८ रोजी मंजुरी देऊन पाणीपुरवठा सुरु केला आहे. अशीच परिस्थिती इतर ११ गावांमधील आहे. त्यामुळे दुष्काळात सापडलेल्या ग्रामस्थांना पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबविण्यासाठी पंचायत समिती व तहसील प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलून जास्तीतजास्त आठ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करुन ग्रामस्थांना जलस्त्रोतांचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.७ गावांतील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेततालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतींनी १९ जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ११ प्रस्तावांना मंजुरी देत पाणीपुरवठाही सुरु करण्यात आला आहे; परंतु, ७ प्रस्ताव हे महिनाभरापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत तहसील कार्यालयाकडे पडून आहेत. त्यामुळे पेडगाव, मोहपुरी, पिंपळा या गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन ग्रामस्थांना तात्काळ पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई