शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

परभणी तालुक्यातील स्थिती:अकरा गावांमध्ये केले जलस्त्रोतांचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:36 IST

तालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती कार्यालयाकडे जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी १९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी तहसील कार्यालयाने ११ गावांतील प्रस्तावांना मुंजरी देऊन पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामध्ये गोविंदपूरवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :तालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती कार्यालयाकडे जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी १९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी तहसील कार्यालयाने ११ गावांतील प्रस्तावांना मुंजरी देऊन पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामध्ये गोविंदपूरवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.परभणी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यातच परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील नदी, नाले, विहीर, बोअर या जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावू लागली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील जलस्त्रोतांनी तळ गाठला. त्यातच दुधना, पूर्णा या नदीचे पात्रही कोरडेठाक पडले आहे. परिणामी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहीरींची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दोन ते तीन कि.मी.ची पायपीट करुन शेतातील जलस्त्रोतातून पाणी आणावे लागत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यातील पाणीटंचाई ओळखून तालुक्यातील किन्होळा, पिंपळगाव स.मि., आर्वी, काष्टगाव, पाथरा, नांदापूर, समसापूर, ब्रह्मपुरीतर्फे पेडगाव, वाडी दमई, पेडगाव, बाभूळगाव, गोविंदपूर, सारंगपूर, मोहपुरी, पिंपळा या गावांतील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती कार्यालयाकडे १९ प्रस्ताव जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी दाखल केले होते. पंचायत समितीने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. तहसील कार्यालयाने १९ प्रस्तावांपैकी ११ प्रस्तावांना मंजुरी देत विहीर व बोअरचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरु आहे. तर गोविंदपूर येथे टँकरने पाणी पुरवठ्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा ग्रामस्थांना सहन कराव्यात लागत आहेत.मंजुरीसाठी लागतोय : एक महिन्याचा कालावधीपरभणी तालुक्यातील १३१ गावांपैकी १४ गावांनी १९ जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल केले; परंतु, प्रस्ताव मंजुरीसाठी महिनाभराचा कालावधी लागत असल्याचे दिसून येत आहे. किन्होळा येथील ग्रामपंचायतीने ५ नोव्हेंबर २०१८ रोजी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन १३ नोव्हेंबर २०१८ रोजी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला; परंतु, त्यानंतर पंचायत समितीने १ डिसेंबर २०१८ रोजी आलेला प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दाखल केला.४तहसील कार्यालयाने २९ डिसेंबर २०१८ रोजी मंजुरी देऊन पाणीपुरवठा सुरु केला आहे. अशीच परिस्थिती इतर ११ गावांमधील आहे. त्यामुळे दुष्काळात सापडलेल्या ग्रामस्थांना पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबविण्यासाठी पंचायत समिती व तहसील प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलून जास्तीतजास्त आठ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करुन ग्रामस्थांना जलस्त्रोतांचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.७ गावांतील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेततालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतींनी १९ जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ११ प्रस्तावांना मंजुरी देत पाणीपुरवठाही सुरु करण्यात आला आहे; परंतु, ७ प्रस्ताव हे महिनाभरापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत तहसील कार्यालयाकडे पडून आहेत. त्यामुळे पेडगाव, मोहपुरी, पिंपळा या गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन ग्रामस्थांना तात्काळ पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई