शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

परभणी जिल्ह्यातील स्थिती : रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:02 IST

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली असून मागील आठवड्यात केवळ २२६ कामेच या योजनेंतर्गत सुरु होती. मागणी घटल्याने कामे थंडावल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीच थंड झाल्या असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली असून मागील आठवड्यात केवळ २२६ कामेच या योजनेंतर्गत सुरु होती. मागणी घटल्याने कामे थंडावल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीच थंड झाल्या असल्याचे दिसत आहे.ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोजगार हमी योजना राबविली जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने राज्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन दिली जात आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या योजनेला मजुरांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी केलेल्या मजुरांची संख्या १ लाखापर्यंत आहे; परंतु, प्रत्यक्षात कामे करण्यासाठी मात्र मजूर फिरकत नसल्याचे दिसत आहे.मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायतींची ११३ आणि यंत्रणांची ९३ अशी केवळ २२६ कामे झाली. या कामांवर ९६१ मजुरांनी काम केले. हजारो मजुरांची नोंदणी झाली असताना केवळ ९५० मजुरांनीच रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला. यावरुन मजुरांनी रोहयोकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. मानवत तालुक्यामध्ये सर्वाधिक १०७ कामे सुरु आहेत. या कामांवर २८९ मजुरांना काम मिळाले. इतर तालुक्यांमध्ये मात्र कामांची संख्या दोन आकडीच आहे. गंगाखेड तालुक्यात १९, जिंतूर तालुक्यात ५, पालम तालुक्यात १८, परभणी १९, पूर्णा २९, सेलू २५, पाथरी तालुक्यात ४ कामे सुरु आहेत. तर सोनपेठ तालुक्यात मागील आठवड्यात रोजगार हमी योजनेतून एकही काम झाले नाही. रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत आणि यंत्रणा अशा दोन स्तरावर कामे केली जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५६० तर यंत्रणांच्या माध्यमातून ४०१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. विशेष म्हणजे, पालम, परभणी, पाथरी आणि सोनपेठ या चार तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील आठवड्यात एकही काम झाले नाही. तर जिंतूर, सेलू आणि सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून एकही काम सुरु झाले नाही. एकंदर रोहयोच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरवली असून लाखो रुपयांची कामे उपलब्ध असूनही मजूर मात्र या योजनेकडे फिरकत नसल्याने प्रशासनाला कामांची संख्या आणि मजुरांची संख्या वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.सुरु असलेली कामे२६ जुलै ते १ आॅगस्ट या आठवड्यातील मजूर उपस्थितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि घरकुल ही दोन कामे मोठ्या प्रमाणात झाली. तर काही ठिकाणी विहीर पुनर्भरणाची कामे करण्यात आली आहेत. तर तहसील स्तरावरुन वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तुती लागवड, फळबाग, रोपवाटिका आणि वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली. त्यातही जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून तुती लागवडीची सर्वाधिक कामे होत आहेत. रोजगार हमी योजनेतून विविध ३० प्रकारची कामे केली जातात. त्यात शेततळे, शेत रस्ते, ढाळीचे बांध, स्मशानभूमी रस्ते इ. कामांचा समावेश आहे; परंतु, प्रत्यक्षात मोजक्याच कामांना मागणी असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार