शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

परभणी जिल्ह्यातील स्थिती : रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:02 IST

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली असून मागील आठवड्यात केवळ २२६ कामेच या योजनेंतर्गत सुरु होती. मागणी घटल्याने कामे थंडावल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीच थंड झाल्या असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली असून मागील आठवड्यात केवळ २२६ कामेच या योजनेंतर्गत सुरु होती. मागणी घटल्याने कामे थंडावल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीच थंड झाल्या असल्याचे दिसत आहे.ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोजगार हमी योजना राबविली जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने राज्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन दिली जात आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या योजनेला मजुरांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी केलेल्या मजुरांची संख्या १ लाखापर्यंत आहे; परंतु, प्रत्यक्षात कामे करण्यासाठी मात्र मजूर फिरकत नसल्याचे दिसत आहे.मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायतींची ११३ आणि यंत्रणांची ९३ अशी केवळ २२६ कामे झाली. या कामांवर ९६१ मजुरांनी काम केले. हजारो मजुरांची नोंदणी झाली असताना केवळ ९५० मजुरांनीच रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला. यावरुन मजुरांनी रोहयोकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. मानवत तालुक्यामध्ये सर्वाधिक १०७ कामे सुरु आहेत. या कामांवर २८९ मजुरांना काम मिळाले. इतर तालुक्यांमध्ये मात्र कामांची संख्या दोन आकडीच आहे. गंगाखेड तालुक्यात १९, जिंतूर तालुक्यात ५, पालम तालुक्यात १८, परभणी १९, पूर्णा २९, सेलू २५, पाथरी तालुक्यात ४ कामे सुरु आहेत. तर सोनपेठ तालुक्यात मागील आठवड्यात रोजगार हमी योजनेतून एकही काम झाले नाही. रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत आणि यंत्रणा अशा दोन स्तरावर कामे केली जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५६० तर यंत्रणांच्या माध्यमातून ४०१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. विशेष म्हणजे, पालम, परभणी, पाथरी आणि सोनपेठ या चार तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील आठवड्यात एकही काम झाले नाही. तर जिंतूर, सेलू आणि सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून एकही काम सुरु झाले नाही. एकंदर रोहयोच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरवली असून लाखो रुपयांची कामे उपलब्ध असूनही मजूर मात्र या योजनेकडे फिरकत नसल्याने प्रशासनाला कामांची संख्या आणि मजुरांची संख्या वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.सुरु असलेली कामे२६ जुलै ते १ आॅगस्ट या आठवड्यातील मजूर उपस्थितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि घरकुल ही दोन कामे मोठ्या प्रमाणात झाली. तर काही ठिकाणी विहीर पुनर्भरणाची कामे करण्यात आली आहेत. तर तहसील स्तरावरुन वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तुती लागवड, फळबाग, रोपवाटिका आणि वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली. त्यातही जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून तुती लागवडीची सर्वाधिक कामे होत आहेत. रोजगार हमी योजनेतून विविध ३० प्रकारची कामे केली जातात. त्यात शेततळे, शेत रस्ते, ढाळीचे बांध, स्मशानभूमी रस्ते इ. कामांचा समावेश आहे; परंतु, प्रत्यक्षात मोजक्याच कामांना मागणी असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार