शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

परभणी जिल्ह्यातील स्थिती : रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:02 IST

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली असून मागील आठवड्यात केवळ २२६ कामेच या योजनेंतर्गत सुरु होती. मागणी घटल्याने कामे थंडावल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीच थंड झाल्या असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली असून मागील आठवड्यात केवळ २२६ कामेच या योजनेंतर्गत सुरु होती. मागणी घटल्याने कामे थंडावल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीच थंड झाल्या असल्याचे दिसत आहे.ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोजगार हमी योजना राबविली जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने राज्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन दिली जात आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या योजनेला मजुरांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी केलेल्या मजुरांची संख्या १ लाखापर्यंत आहे; परंतु, प्रत्यक्षात कामे करण्यासाठी मात्र मजूर फिरकत नसल्याचे दिसत आहे.मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायतींची ११३ आणि यंत्रणांची ९३ अशी केवळ २२६ कामे झाली. या कामांवर ९६१ मजुरांनी काम केले. हजारो मजुरांची नोंदणी झाली असताना केवळ ९५० मजुरांनीच रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला. यावरुन मजुरांनी रोहयोकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. मानवत तालुक्यामध्ये सर्वाधिक १०७ कामे सुरु आहेत. या कामांवर २८९ मजुरांना काम मिळाले. इतर तालुक्यांमध्ये मात्र कामांची संख्या दोन आकडीच आहे. गंगाखेड तालुक्यात १९, जिंतूर तालुक्यात ५, पालम तालुक्यात १८, परभणी १९, पूर्णा २९, सेलू २५, पाथरी तालुक्यात ४ कामे सुरु आहेत. तर सोनपेठ तालुक्यात मागील आठवड्यात रोजगार हमी योजनेतून एकही काम झाले नाही. रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत आणि यंत्रणा अशा दोन स्तरावर कामे केली जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५६० तर यंत्रणांच्या माध्यमातून ४०१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. विशेष म्हणजे, पालम, परभणी, पाथरी आणि सोनपेठ या चार तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील आठवड्यात एकही काम झाले नाही. तर जिंतूर, सेलू आणि सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून एकही काम सुरु झाले नाही. एकंदर रोहयोच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरवली असून लाखो रुपयांची कामे उपलब्ध असूनही मजूर मात्र या योजनेकडे फिरकत नसल्याने प्रशासनाला कामांची संख्या आणि मजुरांची संख्या वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.सुरु असलेली कामे२६ जुलै ते १ आॅगस्ट या आठवड्यातील मजूर उपस्थितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि घरकुल ही दोन कामे मोठ्या प्रमाणात झाली. तर काही ठिकाणी विहीर पुनर्भरणाची कामे करण्यात आली आहेत. तर तहसील स्तरावरुन वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तुती लागवड, फळबाग, रोपवाटिका आणि वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली. त्यातही जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून तुती लागवडीची सर्वाधिक कामे होत आहेत. रोजगार हमी योजनेतून विविध ३० प्रकारची कामे केली जातात. त्यात शेततळे, शेत रस्ते, ढाळीचे बांध, स्मशानभूमी रस्ते इ. कामांचा समावेश आहे; परंतु, प्रत्यक्षात मोजक्याच कामांना मागणी असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार