शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

परभणी शहरातील स्थिती : २७ टँकरने केला जातोय पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:51 IST

शहरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून सद्यस्थितीला २७ टँकरच्या सहाय्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून सद्यस्थितीला २७ टँकरच्या सहाय्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. परभणीकरांसाठी येलदरी प्रकल्पातून पाणी घेतले जात आहे. यावर्षी येलदरी प्रकल्पात उपयुक्त जलसाठा शिल्लक नसून शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राहटी बंधाºयाहून शहराला होणारा पाणीपुरवठा अत्यल्प स्वरुपाचा आहे. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये जलवाहिनी पोहचली नसल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील महिनाभरापासून शहरातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे. टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने टँकरने नियोजन केले आहे. लहान-मोठ्या अशा २७ टँकरच्या सहाय्याने सद्यस्थितीला शहरी भागात पाणीपुरवठा केला जात आहे. नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे नियमित व मूबलक पाणी मिळत नसल्याने शहरवासियांना आता टँकरच्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.मागील १० दिवसांपासून महापालिकेने शहरातील टँकरची संख्या वाढविली आहे. सद्यस्थितीला प्रभाग समिती १ मध्ये ६, प्रभाग समिती ब मध्ये ८ आणि प्रभाग समिती क मध्ये ६ असे १२ हजार लिटरचे २० टँकर शहरात सुरु आहेत. याशिवाय ६ हजार लिटरचे ४ टँकर असून आवश्यतेनुसार या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.याशिवाय महापालिकेच्या मालकीचे ३ टँकर आहेत. त्यामध्ये २ हजार लिटरचा १ आणि पाच हजार लिटरचे २ टँकर असून एकूण २७ टँकरच्या सहाय्याने शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील टंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने टँकर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात निश्चित केले ९५० पॉर्इंटमहानगरपालिकेने टँकर सुरु करण्यापूर्वीच पाणी वितरण करण्याचे नियोजन केले आहे. शहरातील विविध भागांमध्ये सुमारे ९५० पॉर्इंट निश्चित केले असून हे टँकर ठरवून दिलेल्या पॉर्इंट नुसार शहरवासियांना पाणीपुरवठा करीत आहेत. ममता कॉलनी आणि खाजा कॉलनीत जलकुंभावरुन या टँकरला पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. दिवसभरात एक टँकर पाच फेºया करीत आहे.नवीन वसाहतींमध्ये पाण्याची समस्या गंभीर४शहरातील नवीन वसाहतींमध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या भागात महापालिकेची जलवाहिनी पोहचली नसल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. भूजलपातळी खोल गेल्यामुळे विहीर, बोअर आटले असून पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर ओढावली आहे. अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तसेच मनपाने केलेल्या टँकरच्या नियोजना प्रमाणे पाण्याचे वितरण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठराविक भागातच टँकर फेºया करीत असल्याने उर्वरित भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. मनपाने टँकरचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.१४ दिवसांतून एकवेळा पाणी४शहरातील पाणीपुरवठा योजनेचे नियोजनही मागील सहा महिन्यांपासून विस्कळीत झाले आहे. सद्यस्थितीत शहरवासियांना १४ दिवसांतून एकेवळा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी जलवाहिनी असलेल्या भागातही नागरिकांना टंचाई परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीपुरवठा योजना ३० वर्षापूर्वीची जुनी असून जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती असल्याने हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे जलवाहिनी असलेल्या भागातही पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई