शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरातील स्थिती : २७ टँकरने केला जातोय पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:51 IST

शहरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून सद्यस्थितीला २७ टँकरच्या सहाय्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून सद्यस्थितीला २७ टँकरच्या सहाय्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. परभणीकरांसाठी येलदरी प्रकल्पातून पाणी घेतले जात आहे. यावर्षी येलदरी प्रकल्पात उपयुक्त जलसाठा शिल्लक नसून शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राहटी बंधाºयाहून शहराला होणारा पाणीपुरवठा अत्यल्प स्वरुपाचा आहे. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये जलवाहिनी पोहचली नसल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील महिनाभरापासून शहरातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे. टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने टँकरने नियोजन केले आहे. लहान-मोठ्या अशा २७ टँकरच्या सहाय्याने सद्यस्थितीला शहरी भागात पाणीपुरवठा केला जात आहे. नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे नियमित व मूबलक पाणी मिळत नसल्याने शहरवासियांना आता टँकरच्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.मागील १० दिवसांपासून महापालिकेने शहरातील टँकरची संख्या वाढविली आहे. सद्यस्थितीला प्रभाग समिती १ मध्ये ६, प्रभाग समिती ब मध्ये ८ आणि प्रभाग समिती क मध्ये ६ असे १२ हजार लिटरचे २० टँकर शहरात सुरु आहेत. याशिवाय ६ हजार लिटरचे ४ टँकर असून आवश्यतेनुसार या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.याशिवाय महापालिकेच्या मालकीचे ३ टँकर आहेत. त्यामध्ये २ हजार लिटरचा १ आणि पाच हजार लिटरचे २ टँकर असून एकूण २७ टँकरच्या सहाय्याने शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील टंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने टँकर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात निश्चित केले ९५० पॉर्इंटमहानगरपालिकेने टँकर सुरु करण्यापूर्वीच पाणी वितरण करण्याचे नियोजन केले आहे. शहरातील विविध भागांमध्ये सुमारे ९५० पॉर्इंट निश्चित केले असून हे टँकर ठरवून दिलेल्या पॉर्इंट नुसार शहरवासियांना पाणीपुरवठा करीत आहेत. ममता कॉलनी आणि खाजा कॉलनीत जलकुंभावरुन या टँकरला पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. दिवसभरात एक टँकर पाच फेºया करीत आहे.नवीन वसाहतींमध्ये पाण्याची समस्या गंभीर४शहरातील नवीन वसाहतींमध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या भागात महापालिकेची जलवाहिनी पोहचली नसल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. भूजलपातळी खोल गेल्यामुळे विहीर, बोअर आटले असून पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर ओढावली आहे. अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तसेच मनपाने केलेल्या टँकरच्या नियोजना प्रमाणे पाण्याचे वितरण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठराविक भागातच टँकर फेºया करीत असल्याने उर्वरित भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. मनपाने टँकरचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.१४ दिवसांतून एकवेळा पाणी४शहरातील पाणीपुरवठा योजनेचे नियोजनही मागील सहा महिन्यांपासून विस्कळीत झाले आहे. सद्यस्थितीत शहरवासियांना १४ दिवसांतून एकेवळा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी जलवाहिनी असलेल्या भागातही नागरिकांना टंचाई परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीपुरवठा योजना ३० वर्षापूर्वीची जुनी असून जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती असल्याने हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे जलवाहिनी असलेल्या भागातही पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई