शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शिवजयंतीनिमित्त परभणीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:10 IST

शेतात काम करणारा कष्टकरी, शेतकरी दररोज मरतोय. कधी गारपीट, कधी दुष्काळ, अतिवृष्टीने पिके हातची जात आहेत. याहीपेक्षा शेतकरी शासनाच्या धोरणांनी जास्त मरतोय. म्हणून शेतकºयांनी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळेपर्यंत पेटून उठावे, असे आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): शेतात काम करणारा कष्टकरी, शेतकरी दररोज मरतोय. कधी गारपीट, कधी दुष्काळ, अतिवृष्टीने पिके हातची जात आहेत. याहीपेक्षा शेतकरी शासनाच्या धोरणांनी जास्त मरतोय. म्हणून शेतकºयांनी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळेपर्यंत पेटून उठावे, असे आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले.सेलू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजी राजे भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सोमवारी आ.बच्चू कडू बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे होते.यावेळी स्वागताध्यक्ष आ.विजय भांबळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि.प.सभापती अशोक काकडे, श्रीनिवास मुंडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, जि.प.तील गटनेते राम खराबे, अजय चौधरी, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, हेमंतराव आढळकर, रामप्रसाद घोडके, तहसीलदार विद्याचरण कडवकर, एकनाथ पावडे, प्रमोद कुदळे, बाळासाहेब शिंदे, प्रभाकर सुरवसे, नंदकिशोर बाहेती, जयप्रकाश बिहाणी, भास्कर कोलते, डॉ.सुबोध माकोडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, डॉ.संजय हरबडे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.कडू म्हणाले, एकीकडे कर्मचाºयांच्या पगारात वाढ होतेय, मात्र शेतकºयांच्या मालाला भाव मिळत नाही. कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. मात्र मिळाला ४ हजार ३०० रुपये. त्यामुळे कर्जमाफीेपेक्षा तुम्हाला लुटलं किती, याचा अभ्यास शेतकºयांनी करावा. कापूस उत्पादक शेतकºयांची ४८ हजार कोटी रुपयांची लूट केली असल्याचा आरोपही आ.कडू यांनी केला.छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी एकही मंत्री जीवंत ठेवला नसता. मंत्रालयात आत्महत्या का होतात, त्याचे संशोधन करणे दूरच. मात्र शासनाने जाळी लावणे सुरु केले आहे. चुकीच्या परंपरा, चालीरीतीवर खर्च करण्यापेक्षा वसतिगृह, दवाखाने उभारण्यासाठी खर्च करावा, असे आवाहन आ.कडू यांनी केले. संयोजक छगन शेरे यांनी प्रास्ताविक केले. रामराव बोबडे यांनी सूत्रसंचालन तर रामराव गायकवाड यांनी आभार मानले.