शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
3
अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
4
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
5
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
6
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
7
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
8
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
9
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
10
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
11
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
12
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
13
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
14
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
15
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
16
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
17
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
18
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
19
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
20
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर एसटी रुळावर; उत्पन्नात झाली मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी या ...

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी या सात आगारांतर्गत ५५३ बसेसची संख्या आहे. त्यातील ७७ बसेसला दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. यासाठी ८४८ चालक व ४४३ वाहकांची संख्या आहे. कोरोनापूर्वी या सात आगारातून ३७६ बसेसच्या माध्यमातून दिवसागणिक १८५६ बसफेऱ्या करण्यात येत होत्या. त्यातून दिवसागणिक एसटी महामंडळाला ३६ लाख ४७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र त्यानंतर मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले. परिणामी बससेवा बंद करण्यात आली. अनलॉकमध्ये बससेवा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत १३१५ बसफेऱ्या दिवसागणिक होत आहेत. यातून एसटी महामंडळाला ३२ लाख २९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

इतर जिल्ह्यांपेक्षा परभणीची स्थिती उलट

इतर जिल्ह्यात प्रवासी मिळत नसल्याने बसफेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. मात्र परभणी जिल्ह्यात या उलट परिस्थिती असून, मुंबई येथे देशसेवेसाठी जिल्ह्यातील ४०० कर्मचारी २१ नोव्हेंबर रोजी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत परभणीत विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याची स्थिती उलट आहे.

जिल्ह्याचे बसचे उत्पन्न आले बरोबरीत

एसटी मंडळाच्या सात आगारात कोरोनापूर्वी मार्च महिन्यात १८५६ बसफेऱ्यांमधून दिवसाला ३६ लाख ४७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. कोरोनानंतर १३१५ बसफेऱ्या दिवसागणिक होत असून, ३२ लाख २९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात बसचे उत्पन्न कोरोनानंतर पूर्वपदावर येत आहे.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा

परभणी जिल्ह्यातील वाहक व चालक मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठविण्यात आले आहेत. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यात बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने बससेवेसाठी पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठविणे गरजेचे आहे.

विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यात ४ व हिंगोली जिल्ह्यात ३ असे एकूण ७ आगार आहेत. कोरोनाआधी १८५६ बसफेऱ्या होत होत्या. आता १३१५ बसफेऱ्या सुरू आहेत. या बसफेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून, उत्पन्नातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनानंतर एसटी महामंडळाची स्थिती पूर्वपदावर येत आहे.

- मुक्तेश्वर जोशी,

विभागीय नियंत्रक, परभणी