शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

कोरोनानंतर एसटी रुळावर; उत्पन्नात झाली मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी या ...

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी या सात आगारांतर्गत ५५३ बसेसची संख्या आहे. त्यातील ७७ बसेसला दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. यासाठी ८४८ चालक व ४४३ वाहकांची संख्या आहे. कोरोनापूर्वी या सात आगारातून ३७६ बसेसच्या माध्यमातून दिवसागणिक १८५६ बसफेऱ्या करण्यात येत होत्या. त्यातून दिवसागणिक एसटी महामंडळाला ३६ लाख ४७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र त्यानंतर मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले. परिणामी बससेवा बंद करण्यात आली. अनलॉकमध्ये बससेवा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत १३१५ बसफेऱ्या दिवसागणिक होत आहेत. यातून एसटी महामंडळाला ३२ लाख २९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

इतर जिल्ह्यांपेक्षा परभणीची स्थिती उलट

इतर जिल्ह्यात प्रवासी मिळत नसल्याने बसफेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. मात्र परभणी जिल्ह्यात या उलट परिस्थिती असून, मुंबई येथे देशसेवेसाठी जिल्ह्यातील ४०० कर्मचारी २१ नोव्हेंबर रोजी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत परभणीत विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याची स्थिती उलट आहे.

जिल्ह्याचे बसचे उत्पन्न आले बरोबरीत

एसटी मंडळाच्या सात आगारात कोरोनापूर्वी मार्च महिन्यात १८५६ बसफेऱ्यांमधून दिवसाला ३६ लाख ४७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. कोरोनानंतर १३१५ बसफेऱ्या दिवसागणिक होत असून, ३२ लाख २९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात बसचे उत्पन्न कोरोनानंतर पूर्वपदावर येत आहे.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा

परभणी जिल्ह्यातील वाहक व चालक मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठविण्यात आले आहेत. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यात बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने बससेवेसाठी पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठविणे गरजेचे आहे.

विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यात ४ व हिंगोली जिल्ह्यात ३ असे एकूण ७ आगार आहेत. कोरोनाआधी १८५६ बसफेऱ्या होत होत्या. आता १३१५ बसफेऱ्या सुरू आहेत. या बसफेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून, उत्पन्नातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनानंतर एसटी महामंडळाची स्थिती पूर्वपदावर येत आहे.

- मुक्तेश्वर जोशी,

विभागीय नियंत्रक, परभणी