शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

जीव धोक्यात घालून सोयाबीनची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:19 IST

पालम तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी झाली ...

पालम तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी झाली होती. यानंतर शेतकऱ्यांना महागडी औषध व खताचा डोस वापरून निसर्गाच्या कचाट्यात वाचलेले पीक संगोपन केले आहे. आतापर्यंत दोन फवारणी झाल्या आहेत. फुलांतून शेंगा लागण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव पडत आहे. त्यामुळे शेंगा पोखरल्या जात आहेत. या काळात चांगल्या दर्जाचे कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करावी लागत आहे. मात्र पीक वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात फवारणी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिकाने पूर्ण जमीन झाकाळून गेली आहे. त्यामुळे पाठीवर १५ लिटर औषध घेऊन जाताना दमछाक होत आहे. त्यातच पिकात सर्पदंश भीती वाटत आहे. त्यामुळे हे काम करताना भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

चांगला भाव मिळण्याची अपेक्षा

सोयाबीन पिकाची यावर्षी प्रचंड भाववाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावर शेतकरी लक्ष देत आहे. १० हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव गेला होता. त्यामुळे यावर्षी चांगला भाव राहील असा अंदाज बांधून पिकावर फवारणी करण्यासाठी मोठा खर्च केला जात आहे.