शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

निवडणुका ओसरताच ग्रा.पं.ना मिळणार १९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST

परभणी : येथील जिल्हा नियोजन समितीने पंचायत विभागाच्या जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायतींसाठी प्रस्तावित केलेला १९ कोटी रुपयांचा निधी केवळ आचारसंहितेच्या ...

परभणी : येथील जिल्हा नियोजन समितीने पंचायत विभागाच्या जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायतींसाठी प्रस्तावित केलेला १९ कोटी रुपयांचा निधी केवळ आचारसंहितेच्या कारणाने थांबला आहे. निवडणुका पार पडताच हा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींच्या निधीत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे १४ वा वित्त आयोग, १५ वित्त आयोगाचा निधी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वितरित केला जात होता. मात्र, नव्या निर्णयानुसार हा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होत असल्याने ग्रामपंचायतींनाही आता महत्त्व प्राप्त झाले आहे. या निधीबरोबरच ग्रामपंचायत स्तरावर केल्या जाणाऱ्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीने जनसुविधा योजनेंतर्गत १९ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. एप्रिल २०२० मध्येच या आराखड्यास मंजुरी मिळाली होती. मात्र, मध्यंतरी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे हा निधी वितरित करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. राज्यातील विकास कामांना गती देण्याच्या उद्देशाने नियोजन विभागाने प्रस्तावित केलेला १०० टक्के निधी जिल्हा स्तरावर उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता निधीची कोणतीही अडचण नाही. मात्र, हा निर्णय झाला आणि लगेच ग्रामपंचायत निवडणुका लागल्या. त्यामुळे परत ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर या निधीसाठी निर्माण झाला आहे. आता आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर ग्रामपंचायतींवर अनेक नवीन कारभारी विराजमान होतील. त्यामुळे या कारभाऱ्यांनी कामकाज हाती घेताच, नियोजन विभागाने प्रस्तावित केलेल्या कामांचा निधी त्यांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

छोट्या ग्रामपंचायतींना अधिक निधी

ग्रामीण भागात जास्तीत जास्त विकास कामे राबविता यावेत, या उद्देशाने छोट्या ग्रामपंचायतींसाठी नियोजन समितीने अधिक निधी प्रस्तावित केला आहे. त्यामुळे छोट्या ग्रामपंचायतींना हा निधी प्राप्त करून घेण्याची संधी अधिक आहे. नियोजन समितीने प्रस्तावित केलेल्या १९ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये मोठ्या ग्रामपंचायतींसाठी, तर १६ कोटी रुपये छोट्या ग्रामपंचायतींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी छोट्या ग्रामपंचायतींनाच अधिक संधी राहणार आहे.

या कामांसाठी वापरला जातो निधी

ग्रामपंचायतींच्या अंतर्गत स्मशानभूमीतील कामे करणे, अंगणवाड्यांची दुरुस्ती, ग्रामपंचायत इमारतींची दुरुस्ती यासह गावातील विकास कामांसाठी जनसुविधा योजनेतून निधी खर्च केला जातो. त्यामुळे या निधीतून छोटी-मोठी कामे मार्गी लागतात आणि गावाच्या विकासाला चालना मिळते.