शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

परभणी जिल्ह्यात गंगाखेडमध्ये शिवसेनेचा आक्रोश मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:38 IST

गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर १६ एप्रिल रोजी खा़ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ या मोर्चात मतदार संघातील शिवसैनिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर १६ एप्रिल रोजी खा़ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ या मोर्चात मतदार संघातील शिवसैनिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़मतदार संघातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करावा, गारपिटीचे व बोंडअळीचे अनुदान त्वरित द्यावे, मूग, उडीद, तीळ, तूर या पिकांना शंभर टक्के विमा द्यावा, पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करू नये, शेतकºयांची कुचेष्टा करणाºया खाजगी पीक विमा कंपनीकडील पीक विमा योजना रद्द करावी, विमा कंपनीविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला़सोमवारी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास खा़बंडू जाधव यांच्या नेतृत्वखाली भगवती चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला़ सरकारविरोधी घोषणा देत शहरातील मुख्य रस्त्याने हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोरील प्रांगणावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले़ यावेळी शिवसेनेचे गंगाखेड विधानसभाप्रमुख संतोष मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले़ भाजप सरकारने प्रत्येक गोष्टीत शेतकºयांवर अन्याय केला़ हे सरकार केवळ घोषणा देत असून, अंमलबजावणी करीत नाही़ गंगाखेड मतदार संघातील लोकप्रतिनिधी व इतर पक्षातील पुढारी निधी आणण्याच्या कारणावरून आपसात वाद घालत आहेत़ लोकप्रतिनिधी व नेत्यांना शेतकºयांच्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही, असा आरोप मुरकुटे यांनी केला़ त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार जीवराज डापकर यांना निवेदन देण्यात आले़ या प्रसंगी जिल्हाप्रमुख विशाल कदम, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, महिला आघाडीच्या सखुबाई लटपटे, अर्जुन सामाले, तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे, हनुमंत पौळ, काशीनाथ काळबांडे, अ‍ॅड़ महेश साळापुरीकर, बालासाहेब निरस, गजानन पवार, नितीन कदम, संजय सारणीकर, बाळासाहेब राखे, संदीप वाळके, अमोल दिवाण, नागेश कोनार्डे, अनिल सातपुते, संदीप राठोड, जानकीराम पवार, माधव शेंडगे आदींसह शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़खाजगी कंपन्यांसाठी शेतकºयांचा बळी घेतला-जाधवखाजगी कंपन्या जगविण्यासाठी हे सरकार शेतकºयांचे बळी घेत आहे़, असा आरोप खा़बंडू जाधव यांनी यावेळी केला़ दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतकºयांसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेतल्यानेच सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली़ मात्र ही घोषणा केल्यानंतर शेतकºयांना लाभ मिळाला नाही़ उद्योगपती आदानी, आंबानी हेच देश चालवित असून, त्यांच्या खाजगी कंपन्यांनी शेतकºयांना रात्र-दिवस रांगेत उभे करून पीक विमा भरून घेतला़ खरीप हंगामात मोठे नुकसान झाले असतानाही या कंपन्यांनी विम्यापोटी भरलेल्या रकमेतील १० टक्के रक्कमही शेतकºयांना परत दिली नाही़ राज्य शासन व विमा कंपनीने शेतकºयांची क्रूर चेष्टा केली असून, हा अन्याय पाहवत नसल्याने राज्य व केंद्रात सत्तेत असूनही केवळ समाजहितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचे खा़ जाधव यांनी सांगितले़ यावेळी खा़ बंडू जाधव यांनी आपल्या भाषणात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह इतर नेत्यांवरही तोफ डागत सत्यता पडताळून आरोप करण्याचा सल्ला दिला़

टॅग्स :parabhaniपरभणीShiv Senaशिवसेना