शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

जिल्ह्यात वाढले उसाचे क्षेत्र परभणी : यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने उसाचे ...

जिल्ह्यात वाढले उसाचे क्षेत्र

परभणी : यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे निम्न दुधना आणि जायकवाडी प्रकल्पातून नियमित पाणी सोडले जात असल्याने सिंचनक्षेत्र वाढले आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे आपला कल वळविला आहे.

रस्त्याच्या कडेने साचला कचरा

परभणी : शहरातील बाजारपेठ भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने कचऱ्याचे ढीग पडले आहेत. कच्छी बाजार, गांधी पार्क या परिसरात मोठ्या कचराकुंडी नसल्याने कचरा रस्त्यावरच साचविला जात आहे. परिणामी, या भागात दुर्गंधी पसरत असून, मनपा प्रशासनाने नियमित कचरा उचलावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

मोंढ्यातील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

परभणी : येथील नवा मोंढा भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. चारही बाजूंच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, शेतमाल घेवून येणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. बाजार समिती प्रशासनाने या रस्तयांची दुरुस्ती करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

विद्यापीठातील पूल बनला धोकादायक

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून लोहगाव, रायपूर, सायाळा या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंगळगड नाल्यावरील पूल धोकादायक झाला आहे. या पुलाला दोन्ही बाजूंनी कठडे नसल्याने वाहनधारकांसाठी धोका वाढला आहे.

असुविधांमुळे प्रवाशांमध्ये संताप

परभणी : येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृह आणि सुरक्षेच्या अनुषंगाने सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एसटी महामंडळाने या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.

बायोमेट्रिक यंत्रणा सहा महिन्यांपासून बंद

परभणी : येथील शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे प्रशासनाने ही यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता हा संसर्ग कमी झाला असला तरी अजूनही बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली नाही.

अतिक्रमणांमुळे रस्ता बनला अरुंद

परभणी : शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी किरकोळ अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहिलेला नाही. स्टेशन रोड, डनलॉप रोड, जिंतूर रोड, नारायण चाळ या भागात रस्त्यांवरच साहित्य ठेवले जात आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहिला नसून, मनपा व वाहतूक शाखेने हे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

शासकीय कार्यालये किरायाच्या जागेत

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या हद्दीतील अनेक शासकीय कार्यालये खाजगी जागांमध्ये चालविली जात आहेत. त्यामुळे वर्षाकाठी लाखो रुपयांचा भूर्दंड प्रशासनाला सहन करावा लागत आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात या कार्यालयांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिल्यास हा भूर्दंड टळू शकतो. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात शासनाच्या मालकीच्या अनेक जागा उपलब्ध आहेत. त्या जागा कार्यालयासाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.