शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

अधिवेशनात सरकारला जाब विचारणार

By admin | Updated: March 2, 2015 13:40 IST

शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी त्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार सरकार करीत असून, आगामी अधिवेशनात याप्रश्नी शासनाला जाब विचारणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाने ७ हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात केवळ २ हजार कोटींचीच मदत वाटप होत आहे. शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी त्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार सरकार करीत असून, आगामी अधिवेशनात याप्रश्नी शासनाला जाब विचारणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.२८ फेब्रुवारी रोजी परभणी तालुक्यातील दुर्डी या गावास भेट देऊन धनंजय मुंडे यांनी दुष्काळाची पाहणी केली. ते म्हणाले, ४५ रुपये गुंठा या प्रमाणे राज्य शासन मदत देत आहे. दिलेली मदतही जाणीवपूर्वक उशिरात उशिरा दिली जात आहेत. प्रशासनाकडूनही बागायतीचे क्षेत्र कसे कमी दाखविता येईल, याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच अवकाळी पावसाने शेतात जी काही पिके उभी होती त्याचेही नुकसान झाले. त्यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचीही भरपाई शासनाने शेतकर्‍यांना द्यावी, यासाठी आपण आग्रही राहणार असून, आगामी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दुर्डी येथील संजय चोपडे यांच्या शेतासही त्यांनी भेट दिली. यावेळी राकाँ जिल्हाध्यक्ष तथा आ.विजय भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष अँड.स्वराजसिंह परिहार, तालुकाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी खा.सुरेश जाधव आदींची उपस्थिती होती.रविवारी मुंडे यांनी जिंतूर तालुक्यातील पांगरी या गावासही भेट दिली. भर पावसात त्यांनी या गावातील दुष्काळाची पाहणी केली. यावेळी आ. विजय भांबळे, माजी खा.सुरेश जाधव, जि .प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, जि. प. सदस्य विश्‍वनाथ राठोड, रामेश्‍वर जावळे, नानासाहेब राऊत, गजानन कांगणे, सुधाकर जाधव, शरद अंभुरे, प्रसाद बुधवंत, केशव बुधवंत आदींची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून, संकटग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली. /(प्रतिनिधी)

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत> विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी वरुड नृसिंह येथील आत्महत्याग्रस्त महादेव डोंबे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन ५0 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी त्यांनी डोंबे कुटुंबियांच्या दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. राकाँचे प्रदेश सचिव डॉ.संजय रोडगे यांनी एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे मान्य केले. यावेळी आ.विजय भांबळे, नानासाहेब राऊत, माजी खा. सुरेश जाधव, रामेश्‍वर जावळे, शरद अंभुरे, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, मनोज थिटे, सिरकू पाटील, विजय खिस्ते, बाळासाहेब भांबळे, गजानन कांगणे आदींची उपस्थिती होती.