शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

परभणी : अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली असून, ...

परभणी : अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली असून, हाती येत असलेल्या सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क अद्याप पूर्ववत झालेला नाही. गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांना पूर आलेला असून, पुराच्या पाण्यामुळेही नुकसान वाढत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण होऊन पुराचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे नुकसान वाढले आहे. दमदार पावसामुळे सोयाबीन, कापूस बहरले होते. मात्र अतिवृष्टीमुळे हे पीक बेचिराख झाले आहे. पालम, गंगाखेड, पूर्णा, पाथरी या तालुक्यांमध्ये नुकसानीचा आकडा मोठा आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. निम्न दुधना प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने दुधना नदीला पूर आला आहे तर येलदरी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडून विसर्ग होत असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक असल्याने बुधवारीही पूरस्थिती होती.

दरम्यान, प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम हाती घेतले असून, बुधवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची आकडेवारी अंतिम झाली नव्हती. मात्र त्या त्या तालुक्यातून मिळालेल्या माहितीनुसार नुकसानीचा आकडा १ लाख ७५ हजार हेक्टरपेक्षाही अधिक आहे.

दोघांचा मृत्यू; ८१ जनावरे दगावली

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे १२७ गावे बाधित झाली आहेत. मानवत तालुक्यात पोहंडूळ येथे योगेश आनंदराव धापटे (२७) आणि गंगाखेड तालुक्यातील सायाळा येथे सुधाकर शेषेराव सूर्यवंशी (४७) या दोघांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला. मोठे १९ आणि लहान ७२ असे ८३ जनावरे दगावली आहेत. तर १ हजार ६१ कच्च्या घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे.