शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जप्त वाळू साठ्याचा मुक्काम आता विश्रामगृहात; वाळू चोरी होण्याच्या शक्यतेने गंगाखेड तहसील प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 13:47 IST

वाळूमाफियांनी विनापरवाना निर्माण केलेले वाळूसाठे महसूल प्रशसनाने जप्त केले होते. हे वाळू साठे चोरीस जाऊ नये म्हणून येथील शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. 

ठळक मुद्दे रस्त्याच्या बाजूला, शेतात, शासकीय जमिनीवर असल्याने नेमके कोणाचे साठे आहेत ? याचा अंदाज महसूल प्रशासनला येत नव्हता. हे साठे महसूल प्रशासनाने जप्त करून या साठ्यांचा लिलाव पुकारला होता. या वाळूसाठ्याची चोरी होण्याची शक्यता बळावत असल्याने तहसील प्रशासनाने हे वाळू साठे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात हलविले आहेत.

गंगाखेड ( परभणी ): वाळूमाफियांनी विनापरवाना निर्माण केलेले वाळूसाठे महसूल प्रशसनाने जप्त केले होते. हे वाळू साठे चोरीस जाऊ नये म्हणून येथील शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. 

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, मैराळ सांगवी, खळी, दुस्सलगाव, महातपुरी तांडा, गंगाखेड शहर, कासारवाडी परिसर, झोला, पिंपरी, मसला, धारखेड, मुळी, गौंडगाव, भांबरवाडी आदी परिसरात वाळूमाफियांनी गोदावरी नदीतील वाळू उपसा करून साठे तयार केले होते. हे साठे रस्त्याच्या बाजूला, शेतात, शासकीय जमिनीवर असल्याने नेमके कोणाचे साठे आहेत ? याचा अंदाज महसूल प्रशासनला येत नव्हता. हे साठे महसूल प्रशासनाने जप्त करून या साठ्यांचा लिलाव पुकारला होता. परंतु, काही वाळू साठे बेनामी अज्ञातांच्या नावे असल्याने या साठ्यांना लिलावात बोली आली नाही. महसूल प्रशासनाने असे वाळू साठे स्वत: उचलून शासकीय कामावर टाकून ठेकेदाराला विकण्याचा निर्णय घेतला.

रेल्वे उड्डाणपूल, नगरपालिकेच्या अंतर्गत बांधकामासाठी वाळू देऊन याची रक्कम ठेकेदारांकडून वसूल केली. मात्र, महातपुरी परिसरातील काही बेनामी वाळू साठे कोणीही खरेदी केले नाही. त्यामुळे २५० ब्रास वाळू पडून होती. या वाळूसाठ्याची चोरी होण्याची शक्यता बळावत असल्याने तहसील प्रशासनाने हे वाळू साठे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात हलविले आहेत. आता या वाळूसाठ्याची जबाबदारी येथील कर्मचा-यांवर वाढली आहे. यातील वाळू कमी झाल्यास विश्रामगृहातील कर्मचा-यांना दोषी धरले जाणार आहे. 

कर्मचारी असमर्थ की अविश्वास...गंगाखेड तालुक्यातून वाहणा-या गोदावरी नदीतील वाळूला जिल्हाभरासह पर जिल्ह्यात मागणी आहे. त्यामुळे रात्रंदिवस वाळू उपसा केला जातो. वाळू साठे तयार करून शासकीय जमिनीवरच ठेवण्याचे धाडस माफियांमधून होत आहे. त्या त्या भागातील महसूलचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यानेच वाळू साठे तयार करण्याचे धाडस माफिया करीत आहेत. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. तसा आरोपही नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे तहसील प्रशासनावर वाळूसाठे उचलून विश्रामगृह परिसरात हलविण्याची नामुष्की ओढावली आहे. 

जप्त वाळूसाठ्यांचा जाहीर लिलाव केला जात आहे. मात्र, शासकीय जमिनीवर असलेले बेनामी वाळूसाठे लिलावात घेत नसल्याने हे वाळू साठे शासकीय कामासाठी ठेकेदारांना दिले जात आहेत. तसेच ते वाळू साठे चोरीस जाऊ नयेत म्हणून शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. - आसाराम छडीदार, तहसीलदार