शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

जप्त वाळू साठ्याचा मुक्काम आता विश्रामगृहात; वाळू चोरी होण्याच्या शक्यतेने गंगाखेड तहसील प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 13:47 IST

वाळूमाफियांनी विनापरवाना निर्माण केलेले वाळूसाठे महसूल प्रशसनाने जप्त केले होते. हे वाळू साठे चोरीस जाऊ नये म्हणून येथील शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. 

ठळक मुद्दे रस्त्याच्या बाजूला, शेतात, शासकीय जमिनीवर असल्याने नेमके कोणाचे साठे आहेत ? याचा अंदाज महसूल प्रशासनला येत नव्हता. हे साठे महसूल प्रशासनाने जप्त करून या साठ्यांचा लिलाव पुकारला होता. या वाळूसाठ्याची चोरी होण्याची शक्यता बळावत असल्याने तहसील प्रशासनाने हे वाळू साठे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात हलविले आहेत.

गंगाखेड ( परभणी ): वाळूमाफियांनी विनापरवाना निर्माण केलेले वाळूसाठे महसूल प्रशसनाने जप्त केले होते. हे वाळू साठे चोरीस जाऊ नये म्हणून येथील शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. 

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, मैराळ सांगवी, खळी, दुस्सलगाव, महातपुरी तांडा, गंगाखेड शहर, कासारवाडी परिसर, झोला, पिंपरी, मसला, धारखेड, मुळी, गौंडगाव, भांबरवाडी आदी परिसरात वाळूमाफियांनी गोदावरी नदीतील वाळू उपसा करून साठे तयार केले होते. हे साठे रस्त्याच्या बाजूला, शेतात, शासकीय जमिनीवर असल्याने नेमके कोणाचे साठे आहेत ? याचा अंदाज महसूल प्रशासनला येत नव्हता. हे साठे महसूल प्रशासनाने जप्त करून या साठ्यांचा लिलाव पुकारला होता. परंतु, काही वाळू साठे बेनामी अज्ञातांच्या नावे असल्याने या साठ्यांना लिलावात बोली आली नाही. महसूल प्रशासनाने असे वाळू साठे स्वत: उचलून शासकीय कामावर टाकून ठेकेदाराला विकण्याचा निर्णय घेतला.

रेल्वे उड्डाणपूल, नगरपालिकेच्या अंतर्गत बांधकामासाठी वाळू देऊन याची रक्कम ठेकेदारांकडून वसूल केली. मात्र, महातपुरी परिसरातील काही बेनामी वाळू साठे कोणीही खरेदी केले नाही. त्यामुळे २५० ब्रास वाळू पडून होती. या वाळूसाठ्याची चोरी होण्याची शक्यता बळावत असल्याने तहसील प्रशासनाने हे वाळू साठे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात हलविले आहेत. आता या वाळूसाठ्याची जबाबदारी येथील कर्मचा-यांवर वाढली आहे. यातील वाळू कमी झाल्यास विश्रामगृहातील कर्मचा-यांना दोषी धरले जाणार आहे. 

कर्मचारी असमर्थ की अविश्वास...गंगाखेड तालुक्यातून वाहणा-या गोदावरी नदीतील वाळूला जिल्हाभरासह पर जिल्ह्यात मागणी आहे. त्यामुळे रात्रंदिवस वाळू उपसा केला जातो. वाळू साठे तयार करून शासकीय जमिनीवरच ठेवण्याचे धाडस माफियांमधून होत आहे. त्या त्या भागातील महसूलचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यानेच वाळू साठे तयार करण्याचे धाडस माफिया करीत आहेत. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. तसा आरोपही नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे तहसील प्रशासनावर वाळूसाठे उचलून विश्रामगृह परिसरात हलविण्याची नामुष्की ओढावली आहे. 

जप्त वाळूसाठ्यांचा जाहीर लिलाव केला जात आहे. मात्र, शासकीय जमिनीवर असलेले बेनामी वाळूसाठे लिलावात घेत नसल्याने हे वाळू साठे शासकीय कामासाठी ठेकेदारांना दिले जात आहेत. तसेच ते वाळू साठे चोरीस जाऊ नयेत म्हणून शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. - आसाराम छडीदार, तहसीलदार