शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

२० लाख नागरिकांची सुरक्षा नऊ कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:18 IST

परभणी : अन्नपदार्थांबरोबरच सुदृढ आरोग्यासाठी लागणाऱ्या औषधींमधील भेसळ रोखण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन या विभागांमध्ये मनुष्यबळाचा अभाव ...

परभणी : अन्नपदार्थांबरोबरच सुदृढ आरोग्यासाठी लागणाऱ्या औषधींमधील भेसळ रोखण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन या विभागांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असून, केवळ नऊ अधिकारी- कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यातील २० लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार येऊन ठेपला आहे.

या कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त अन्न हे पद भरलेले असून, सहाय्यक आयुक्त औषध हे पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांचे १, औषध निरीक्षक, आस्थापना विभागातील लिपिक वरिष्ठ, लिपिक, प्रमुख लिपिक ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे चार अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे अधिकारी - कर्मचाऱ्यांची तपासणी करताना अक्षरशः कसरत होत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखांपर्यंत पोहोचली असून, या लोकसंख्येचा विचार करता अन्न व औषध प्रशासनाकडे सध्या अत्यल्प मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे अन्न भेसळ रोखण्याच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. शासनाने किमान लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचा आराखडा मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.

औषधी दुकानांच्या तपासणीला खो

जिल्ह्यात साधारणत: २ हजारांपेक्षा अधिक औषधी दुकाने आहेत. अनेक दुकानांवर अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत (फार्मसिस्ट नसलेल्या) काम करून घेतले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे; परंतु मनुष्यबळाचा अभाव असल्याने औषधी दुकानांच्या नियमित तपासण्या होत नाहीत. परिणामी औषधी विक्रेत्यांचे फावत आहे.

हॉटेल तपासणीसाठी अडचणी

जिल्ह्यात साधारणतः ४०० पेक्षा अधिक मोठी हॉटेल्स आणि स्वीट मार्ट आहेत. या हॉटेल्सच्या तपासणीसाठीही अडचणी निर्माण होत आहेत. चार कर्मचारी जिल्ह्यातील किती हॉटेल्सपर्यंत पोहोचणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे

कोर्टकचेरीसाठी द्यावा लागतो वेळ

हॉटेल्स व औषधी दुकानांच्या तपासणीबरोबरच न्यायप्रविष्ठ प्रकरणांचाही अधिकाऱ्यांना पाठपुरवा करावा लागतो. गुटखा विक्री विरुद्धच्या सर्व कारवाया या कार्यालयामार्फत होतात. त्यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रकरण कोर्टात दाखल करण्यापासून ते प्रत्येक सुनावणीला हजर राहाणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, पुरावे जमा करणे आदी कामे अधिकाऱ्यांना करावी लागतात. यात मोठा वेळ खर्ची जातो. त्याचाही परिणामही तपासण्यांवर होत आहे.

या कार्यालयातून परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. मनुष्यबळ कमी असले तरी वर्षभर तपासण्या होतात. मागील वर्षात जवळपास ३०० हॉटेल्स तपासण्या करण्यात आल्या. १०० अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून, सात जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे व भेसळीविरुद्ध वर्षभर सातत्याने कारवाया सुरू आहेत. सण, उत्सवाच्या काळात या तपासण्या वाढविल्या जातात.

नारायण सरकटे, सहाय्यक आयुक्त अन्न