शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

२० लाख नागरिकांची सुरक्षा नऊ कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:18 IST

परभणी : अन्नपदार्थांबरोबरच सुदृढ आरोग्यासाठी लागणाऱ्या औषधींमधील भेसळ रोखण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन या विभागांमध्ये मनुष्यबळाचा अभाव ...

परभणी : अन्नपदार्थांबरोबरच सुदृढ आरोग्यासाठी लागणाऱ्या औषधींमधील भेसळ रोखण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन या विभागांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असून, केवळ नऊ अधिकारी- कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यातील २० लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार येऊन ठेपला आहे.

या कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त अन्न हे पद भरलेले असून, सहाय्यक आयुक्त औषध हे पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांचे १, औषध निरीक्षक, आस्थापना विभागातील लिपिक वरिष्ठ, लिपिक, प्रमुख लिपिक ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे चार अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे अधिकारी - कर्मचाऱ्यांची तपासणी करताना अक्षरशः कसरत होत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखांपर्यंत पोहोचली असून, या लोकसंख्येचा विचार करता अन्न व औषध प्रशासनाकडे सध्या अत्यल्प मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे अन्न भेसळ रोखण्याच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. शासनाने किमान लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचा आराखडा मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.

औषधी दुकानांच्या तपासणीला खो

जिल्ह्यात साधारणत: २ हजारांपेक्षा अधिक औषधी दुकाने आहेत. अनेक दुकानांवर अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत (फार्मसिस्ट नसलेल्या) काम करून घेतले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे; परंतु मनुष्यबळाचा अभाव असल्याने औषधी दुकानांच्या नियमित तपासण्या होत नाहीत. परिणामी औषधी विक्रेत्यांचे फावत आहे.

हॉटेल तपासणीसाठी अडचणी

जिल्ह्यात साधारणतः ४०० पेक्षा अधिक मोठी हॉटेल्स आणि स्वीट मार्ट आहेत. या हॉटेल्सच्या तपासणीसाठीही अडचणी निर्माण होत आहेत. चार कर्मचारी जिल्ह्यातील किती हॉटेल्सपर्यंत पोहोचणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे

कोर्टकचेरीसाठी द्यावा लागतो वेळ

हॉटेल्स व औषधी दुकानांच्या तपासणीबरोबरच न्यायप्रविष्ठ प्रकरणांचाही अधिकाऱ्यांना पाठपुरवा करावा लागतो. गुटखा विक्री विरुद्धच्या सर्व कारवाया या कार्यालयामार्फत होतात. त्यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रकरण कोर्टात दाखल करण्यापासून ते प्रत्येक सुनावणीला हजर राहाणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, पुरावे जमा करणे आदी कामे अधिकाऱ्यांना करावी लागतात. यात मोठा वेळ खर्ची जातो. त्याचाही परिणामही तपासण्यांवर होत आहे.

या कार्यालयातून परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. मनुष्यबळ कमी असले तरी वर्षभर तपासण्या होतात. मागील वर्षात जवळपास ३०० हॉटेल्स तपासण्या करण्यात आल्या. १०० अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून, सात जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे व भेसळीविरुद्ध वर्षभर सातत्याने कारवाया सुरू आहेत. सण, उत्सवाच्या काळात या तपासण्या वाढविल्या जातात.

नारायण सरकटे, सहाय्यक आयुक्त अन्न