शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अनलॉकमध्ये शाळा बंद; शिक्षण सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शाळा बंद ...

परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत १५ जूनपासून सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत शंभर टक्के उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी घरीच असले तरी शिक्षकांना मात्र शाळेत येऊन शैक्षणिक कार्य करावे लागणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. यावर्षी कोरोना कमी होत असल्याने जिल्हा प्रशासन अनलॉकची प्रक्रिया राबवित आहे. सोमवारपासून सर्व व्यवहार नियमित करण्यात आले. मात्र शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष देखील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेऊनच शिकावे लागणार आहे.

भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या लाटेत बालके अधिक प्रमाणात बाधित होतील, असेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी अद्याप निर्णय झाला नाही. मात्र माध्यमिक आणि प्राथमिक दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नावे पत्र काढले असून, १५ जूनपासून सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. याच कालावधीत निकाल तयार करणे, पुढील शैक्षणिक सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया राबविणे यासह इतर कामे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहेत.

गुरुजींची शाळा होणार सुरू

जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नसली तरी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश, ऑनलाइन शिक्षण, निकाल तयार करणे आदी कामे शिक्षक शाळेमध्ये उपस्थित राहून करणार आहेत. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थित नसले तरी शिक्षकांना मात्र उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

शाळा सुरू करायची म्हटली तर...

जिल्ह्यात जवळपास सर्वच व्यवहार पूर्ववत झाले असले तरी शाळांच्या बाबत मात्र अद्याप निर्णय झाला नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पूर्णवेळ शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे शैक्षणिक वर्षही ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना पार पाडावे लागणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून शाळेत १०० टक्के उपस्थित राहणे बंधनकारक आहे. विद्यार्थी शाळांमध्ये बोलावण्या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा करुन पुढील आदेश निर्गमित केला जाईल, असे पत्र प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे.