शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमध्ये शाळा बंद; शिक्षण सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शाळा बंद ...

परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत १५ जूनपासून सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत शंभर टक्के उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी घरीच असले तरी शिक्षकांना मात्र शाळेत येऊन शैक्षणिक कार्य करावे लागणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. यावर्षी कोरोना कमी होत असल्याने जिल्हा प्रशासन अनलॉकची प्रक्रिया राबवित आहे. सोमवारपासून सर्व व्यवहार नियमित करण्यात आले. मात्र शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष देखील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेऊनच शिकावे लागणार आहे.

भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या लाटेत बालके अधिक प्रमाणात बाधित होतील, असेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी अद्याप निर्णय झाला नाही. मात्र माध्यमिक आणि प्राथमिक दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नावे पत्र काढले असून, १५ जूनपासून सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. याच कालावधीत निकाल तयार करणे, पुढील शैक्षणिक सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया राबविणे यासह इतर कामे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहेत.

गुरुजींची शाळा होणार सुरू

जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नसली तरी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश, ऑनलाइन शिक्षण, निकाल तयार करणे आदी कामे शिक्षक शाळेमध्ये उपस्थित राहून करणार आहेत. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थित नसले तरी शिक्षकांना मात्र उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

शाळा सुरू करायची म्हटली तर...

जिल्ह्यात जवळपास सर्वच व्यवहार पूर्ववत झाले असले तरी शाळांच्या बाबत मात्र अद्याप निर्णय झाला नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पूर्णवेळ शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे शैक्षणिक वर्षही ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना पार पाडावे लागणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून शाळेत १०० टक्के उपस्थित राहणे बंधनकारक आहे. विद्यार्थी शाळांमध्ये बोलावण्या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा करुन पुढील आदेश निर्गमित केला जाईल, असे पत्र प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे.