शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा वाजली, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मागील महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा ...

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मागील महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी अद्याप प्रशासनाने निश्चित केली नसल्याने पालकांसमोर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील ७०४ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. दि. १७ ऑगस्टपासून जिल्ह्यातील आठवी ते दहावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते सातवी, आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यातील बहुतांश शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील जवळपास ७५० शाळा सध्या सुरू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवताना शाळेतील सॅनिटायझेशन व मुलांच्या आरोग्याच्या जबाबदारीबाबत वरिष्ठ पातळीवरून लेखी स्वरूपात आदेश न काढल्याने पालकांसमोर मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे ही जबाबदारी निश्चित करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

शासन निर्णयाची प्रतीक्षा

शहरी भागातील आठवी ते दहावीच्या अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. यामध्ये खासगी शाळांचा समावेश आहे. मात्र, महापालिका स्तरावरील व अन्य शाळांबाबत शासन स्तरावरून आदेश आले नसल्याने व स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांनी याबाबतचा निर्णय न घेतल्याने काही शाळा सुरू होणे बाकी आहेत. ग्रामीण भागात सर्व गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

ग्रामीण भागातील शाळांमध्ये सॅनिटायझेशन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत सॅनिटायझेशन व लसीकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, याबाबतचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यावा लागणार आहे, असे समजते.

पालकांसमोर शाळेत पाठविण्याचा प्रश्न

अनेक गावांमध्ये मागील महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत. त्यामुळे तेथील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शहरी भागात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे पालकांसमोर शहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवताना प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्ह्यातील ७५० शाळा सुरू

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या व काही खासगी संस्थेच्या मिळून ७५० शाळा सुरू झाल्या आहेत. यात पहिली ते सातवीचे काही वर्ग तसेच आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. आठवी ते दहावीच्या एकूण १ हजार ८०५ शाळा आहेत, यातील उर्वरित शाळा सुरु होणे बाकी आहेत.

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली ३४९७९

दुसरी ३६६०५

तिसरी ३८१६४

चौथी ३७२१९

पाचवी २७३००

सहावी ३६२६३

सातवी ३५६४३

आठवी ३५५६९

नववी ३२३००

दहावी २८४४०