शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

शाळेची घंटा वाजली, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मागील महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा ...

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मागील महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी अद्याप प्रशासनाने निश्चित केली नसल्याने पालकांसमोर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील ७०४ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. दि. १७ ऑगस्टपासून जिल्ह्यातील आठवी ते दहावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते सातवी, आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यातील बहुतांश शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील जवळपास ७५० शाळा सध्या सुरू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवताना शाळेतील सॅनिटायझेशन व मुलांच्या आरोग्याच्या जबाबदारीबाबत वरिष्ठ पातळीवरून लेखी स्वरूपात आदेश न काढल्याने पालकांसमोर मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे ही जबाबदारी निश्चित करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

शासन निर्णयाची प्रतीक्षा

शहरी भागातील आठवी ते दहावीच्या अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. यामध्ये खासगी शाळांचा समावेश आहे. मात्र, महापालिका स्तरावरील व अन्य शाळांबाबत शासन स्तरावरून आदेश आले नसल्याने व स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांनी याबाबतचा निर्णय न घेतल्याने काही शाळा सुरू होणे बाकी आहेत. ग्रामीण भागात सर्व गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

ग्रामीण भागातील शाळांमध्ये सॅनिटायझेशन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत सॅनिटायझेशन व लसीकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, याबाबतचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यावा लागणार आहे, असे समजते.

पालकांसमोर शाळेत पाठविण्याचा प्रश्न

अनेक गावांमध्ये मागील महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत. त्यामुळे तेथील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शहरी भागात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे पालकांसमोर शहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवताना प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्ह्यातील ७५० शाळा सुरू

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या व काही खासगी संस्थेच्या मिळून ७५० शाळा सुरू झाल्या आहेत. यात पहिली ते सातवीचे काही वर्ग तसेच आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. आठवी ते दहावीच्या एकूण १ हजार ८०५ शाळा आहेत, यातील उर्वरित शाळा सुरु होणे बाकी आहेत.

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली ३४९७९

दुसरी ३६६०५

तिसरी ३८१६४

चौथी ३७२१९

पाचवी २७३००

सहावी ३६२६३

सातवी ३५६४३

आठवी ३५५६९

नववी ३२३००

दहावी २८४४०