शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शाळेची घंटा वाजली, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मागील महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा ...

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मागील महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी अद्याप प्रशासनाने निश्चित केली नसल्याने पालकांसमोर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील ७०४ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. दि. १७ ऑगस्टपासून जिल्ह्यातील आठवी ते दहावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते सातवी, आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यातील बहुतांश शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील जवळपास ७५० शाळा सध्या सुरू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवताना शाळेतील सॅनिटायझेशन व मुलांच्या आरोग्याच्या जबाबदारीबाबत वरिष्ठ पातळीवरून लेखी स्वरूपात आदेश न काढल्याने पालकांसमोर मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे ही जबाबदारी निश्चित करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

शासन निर्णयाची प्रतीक्षा

शहरी भागातील आठवी ते दहावीच्या अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. यामध्ये खासगी शाळांचा समावेश आहे. मात्र, महापालिका स्तरावरील व अन्य शाळांबाबत शासन स्तरावरून आदेश आले नसल्याने व स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांनी याबाबतचा निर्णय न घेतल्याने काही शाळा सुरू होणे बाकी आहेत. ग्रामीण भागात सर्व गावांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

ग्रामीण भागातील शाळांमध्ये सॅनिटायझेशन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत सॅनिटायझेशन व लसीकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, याबाबतचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यावा लागणार आहे, असे समजते.

पालकांसमोर शाळेत पाठविण्याचा प्रश्न

अनेक गावांमध्ये मागील महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत. त्यामुळे तेथील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शहरी भागात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे पालकांसमोर शहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवताना प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्ह्यातील ७५० शाळा सुरू

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या व काही खासगी संस्थेच्या मिळून ७५० शाळा सुरू झाल्या आहेत. यात पहिली ते सातवीचे काही वर्ग तसेच आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. आठवी ते दहावीच्या एकूण १ हजार ८०५ शाळा आहेत, यातील उर्वरित शाळा सुरु होणे बाकी आहेत.

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली ३४९७९

दुसरी ३६६०५

तिसरी ३८१६४

चौथी ३७२१९

पाचवी २७३००

सहावी ३६२६३

सातवी ३५६४३

आठवी ३५५६९

नववी ३२३००

दहावी २८४४०