शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेता यावा, यासाठी पाचवी व आठवी वर्गत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेता यावा, यासाठी पाचवी व आठवी वर्गत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. मात्र पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्याचे वर्षभराचे मूल्यामापन करणे गरजेचे असताना य विद्यार्थ्यांची मात्र परीक्षा घेतली जात नसल्याने पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही? तर दुसरीकडे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेता यावा, यासाठी पाचवी व आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन २३ मे रोजी केले जात आहे, तर दुसरीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याचे वार्षिक मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात विद्यार्थ्याने कशा पद्धतीने अभ्यास केला हे पाहिले पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य होणार नसल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने उत्तीर्ण केले आहे, तर दुसरीकडे शिष्यवृत्तीच्या परीक्षा घेतल्या जात असल्याने परभणी जिल्ह्यातील पालकांमधून शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते तर शाळेची का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पालक काय म्हणतात...

अनलॉक प्रक्रियेनंतर पाचवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू झालेले होते. मात्र त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा निर्बंध आले. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात आले. मात्र गुणवत्तेवरचे काय?

- राधाकिशन माेरे, पालक

एकीकडे शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते, तर दुसरीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाते. विद्यार्थ्यांची त्या त्या वर्गातील अभ्यासक्रमाची पातळी व क्षमता यांचे मूल्यापनांसाठी परीक्षा आवश्यक आहे.

- रामेश्वर जाधव, पालक

ही ढकलगाडी काय कामाची

कोविड काळात ऑनलाइन, ऑफलाइन, यू-ट्यूब, गुगलच्या माध्यमातून पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्याचे शिक्षण सुरू होते. परंतु, राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून राज्याच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले आहे. या विद्यार्थ्याचे वर्षभराचे मूल्यांकन करणे गरजेचे असतानाही शिक्षण विभागाने मात्र त्याकडे सध्याच्या कोरोनाच्या आपत्तीत दुर्लक्ष केले आहे.

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात...

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास किती झाला. यासाठी मूल्यामापन ही आवश्यक क्रिया आहे. सर्व विषयाची परीक्षा शक्य नसेल तर किमान गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयाची ऑफलाइन परीक्षा घेणे गरजेचे आहे.

- सदानंद देशमाने

शिक्षणतज्ज्ञ

शिष्यवृत्ती परीक्षा देणारे विद्यार्थी मर्यादित असतात. परीक्षेचा वेळही मर्यादित असतो. त्यामुळे ही परीक्षा ऑनलाइन घेता येते. मात्र पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सद्यस्थितीत घेणे शक्य नाही.

- भुजंग थोरे

शिक्षणतज्ज्ञ

यावर्षी कोरोनाच्या काळात कधी ऑफलाइन, तर कधी ऑनलाइन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. त्यामुळे किमान ऑनलाइन परीक्षा घेणे आवश्यक होते. मात्र शासनाने सरसकट पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

- राजू वाघ, शिक्षणतज्ज्ञ