शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

जलसाठा घटल्याने टंचाईची वाढली तीव्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:15 IST

परभणी : जिल्ह्यातील ८ लघु प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने या प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होत ...

परभणी : जिल्ह्यातील ८ लघु प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने या प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या प्रशासनाला आता टंचाईसाठी देखील कामे हाती घ्यावी लागणार आहेत.

जिल्ह्यात यावर्षी कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने पाणीटंचाई निवारणाच्या कामांकडे दुर्लक्ष झाले. उन्हाळ्याला सुरुवात झाली असतानाही प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही.

मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे आतापर्यंत टंचाई जाणवली नाही; परंतु मागच्या काही दिवसांपासून प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होत आहे. जिल्ह्यात एकूण २२ लघु प्रकल्प असून, त्यातील ८ लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. या प्रकल्पात पाणीच नसल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय ७ प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्‍क्‍यांपर्यंत साठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात लघु प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

...हे प्रकल्प कोरडे

परभणी तालुक्यातील पेडगाव, सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी, जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

बंधाऱ्यांनी अनेक गावांना तारले

प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाला असला तरी गोदावरी नदी पात्रावर असलेल्या बंधाऱ्यांमध्ये मात्र पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या बंधार्‍यातून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात १६.२७ दलघमी, मुद्गल बंधाऱ्यात ४.५४ दलघमी, ढालेगाव बंधाऱ्याचे ७.३९ आणि तारूगव्हाण येथील बंधाऱ्यात ५.३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर परिसरातील अनेक गावांची तहान भागविली जात आहे.

मध्‍यम प्रकल्‍पात १८ दलघमी साठा

जिल्ह्यात दोन मध्यम प्रकल्प आहेत. त्यात एकूण १८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २८.५ दलघमी असून, प्रत्यक्षात या प्रकल्पात केवळ ८.५२ दलघमी जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे, तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३४.०८ दलघमी असून, या प्रकल्पात सध्या १०.९४ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आणखी एक ते दीड महिना पाणी उपलब्ध होऊ शकते.