शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मातीचा भराव वाहून गेल्याने उद्भवणार टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:30 IST

गंगाखेड : शहराजवळील मुळी बंधाऱ्याला गेट नसल्याने मागच्या वर्षभरात या बंधाऱ्यात पाणी साचले नाही. मात्र गोदावरी नदीपात्रात मातीचा भराव ...

गंगाखेड : शहराजवळील मुळी बंधाऱ्याला गेट नसल्याने मागच्या वर्षभरात या बंधाऱ्यात पाणी साचले नाही. मात्र गोदावरी नदीपात्रात मातीचा भराव टाकून धारखेडजवळ केलेल्या छोट्याखानी बंधाऱ्यात साचलेले पाणीही आता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहून गेले आहे. पाईप टाकताना १६ फेब्रुवारी रोजी हा बंधारा फुटला असून, पाणी वाहून गेल्याने उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोदावरी नदीकाठी गंगाखेड शहर असून सुद्धा उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. शहरातील काही भागाला मासोळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात आहे.तर गोदावरी नदी परिसर व अन्य भागाला गाेदावरील नदीपात्रातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. सद्यस्थितीत शहराला ८ ते १० दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात गोदावरी नदीपात्र कोरडे पडतात. शहरातील काही भागाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मागील पावसाळी हंगामात तालुक्यात पावसाने जोरदारी हजेरी लावल्याने मासोळी प्रकल्प १०० टक्के भरला. गोदावरी नदीपात्रातही गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे कंत्राटदाराने नदीपात्रात टाकलेल्या मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यान, नदीपात्रातील पाणी दोन महिने पुरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवण झाली होती. याच पाण्यातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मातीच्या कच्च्या रस्त्यात पाईप टाकण्याचे काम केले जात असल्याने मातीचा भराव फुटल्याने साठवण झालेले पाणी नदीपात्रात वाहून गेले. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेल्या पाण्याचा साठा आगामी उन्हाळ्यापर्यंत कायम ठेवण्यास स्थानिक नगरपालिका व महसूल प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे दोन महिने पुरेल एवढा झालेला पाणीसाठा क्षणात वाहून गेला. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या भीषण पाणीटंचाईला हे स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

महसूल प्रशासनाला दिली होती कल्पना

गंगाखेड शहराजवळ गोदावरी नदीपात्रात साठवण झालेल्या पाण्यातून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. नगरपालिका प्रशासनाने ८ फेब्रुवारी रोजी तहसील व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात पत्र दिले होते. त्यामध्ये भविष्यात शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवित जलवाहिनी टाकण्याच्या कामाविषयी आपल्यास्तरावर कार्यवाही करण्याची विनंती यामध्ये केली होती. मात्र यावर कोणतीच कारवाई झाली नाही. १६ फेब्रुवारी रोजी काही अज्ञात व्यक्तींनी कच्च्या मातीचा भराव फोडल्याने गोदावरी नदीपात्रात साठवण झालेले पाणी वाहून गेले. दरम्यान, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी या मातीचा भराव फोडून पाणी सोडून देणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे केली आहे.