शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणीकरांना भेडसावणार टंचाई : राहटीतील पाणी संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:29 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणीसाठा संपण्याची ही दुसरी वेळ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणीसाठा संपण्याची ही दुसरी वेळ आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. या बंधाºयात सिद्धेश्वर धरणामधून पाणी घेतले जाते. डिसेंबरमध्ये पहिल्याच आठवड्यात बंधाºयातील पाणी संपले होते, तेव्हा महानगरपालिकेने सिद्धेश्वर बंधाºयातून शहरासाठी पाण्याची मागणी नोंदविली. १ दलघमी पाणी राहटी बंधाºयात दाखल होईपर्यंत ३ दिवस शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागला.राहटी बंधाºयात पाणी दाखल झाले खरे; परंतु, बंधाºयाचे गेट नादुरुस्त झाल्याने बंधाºयात आलेले अर्ध्याहून अधिक पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे बंधाºयातील पाणी वाहून गेल्याने या अधिकाºयांनी तातडीने दुरुस्ती केली. परंतु, शहरवासियांसाठी केवळ अर्धेच पाणी शिल्लक राहिले. त्यानंतर १५ ते २० दिवसातच शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली. आज मात्र हा बंधारा कोरडाठाक पडला आहे.उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ होणे सहाजीक आहे; परंतु, हिवाळ्यातच शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.बंधाºयातील पाणीसाठा कमी होत असताना पाणी उपलब्ध करुन घेण्यासंदर्भात महापालिकेकडून पाठपुरावा झाला नाही. बंधाºयातील पाणी संपण्यापूर्वीच या बंधाºयात पाणीसाठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु, हे उपाय करताना महापालिका प्रशासन कमी पडले. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा बंधारा पूर्णत: कोरडा झाला आहे. त्यामुळे बंधाºयातून पाणी उपसा करणारे विद्युतपंप दिवसभर बंद राहिले. परिणामी मंगळवारपासून शहरवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.पाटबंधारे विभागाने दिला नकारराहटी बंधाºयात यापूर्वी दाखल झालेले पाणी पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे वाहून गेले होते. त्यामुळे सिद्धेश्वर येथून हे पाणी पुन्हा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. महानगरपालिकेने ही बाब जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार १५ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना पत्र पाठवून वाहून गेलेल्या १ दलघमी पाण्याची मागणी केली. मात्र या विभागाने पाणीसाठा उपलब्ध नाही, असे कारण देऊन असमर्थता दर्शविली.निम्न दुधनाकडेही पाठपुरावापाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून राहटी बंधाºयासाठी पाणी घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकाºयांकडे तशी मागणी नोंदविली. जिल्हाधिकाºयांनीही औरंगाबाद येथे या संदर्भात पत्र व्यवहार केल्याचे सांगण्यात आले.परंतु, राहटी बंधाºयातील पाणी संपले तरीही पर्यायी व्यवस्था झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परभणीकरांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.पाणीप्रश्नाकडे डोळेझाकशहरामध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासही मनपा प्रशासन कमी पडत आहे. अशी परिस्थिती असताना घरपट्टी, पाणीपट्टी दरवाढ केली जात आहे. एकीकडे सुविधा नाहीत, तर दुसरीकडे दरवाढ होत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. शहरासाठी पाणी उपलब्ध करणे ही मनपा प्रशासनाची जबाबदारी आहे; परंतु, प्रशासनाने पाणीप्रश्नाकडे डोळेझाक केल्याचे दिसत आहे. महापालिकेने शहरासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पत्र व्यवहार केला ही असेल. परंतु, मनपाचा पाठपुरावा कमी पडल्यानेच शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत.