शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

सरपंचांनी अभ्यास करून गावचा विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:30 IST

परभणी : शासन निर्णयांचा व्यवस्थित अभ्यास करून त्याप्रमाणे सरपंचांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...

परभणी : शासन निर्णयांचा व्यवस्थित अभ्यास करून त्याप्रमाणे सरपंचांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे. परभणी पंचायत समितीच्यावतीने ‘आमचा गाव, आमचा विकास’ कार्यक्रमांतर्गत गाव विकास आराखड्यासंबंधी १७ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होेते. या प्रशिक्षणात शिवानंद टाकसाळे यांनी सरपंचांशी संवाद साधला. ते म्हणाले, ग्रामीण भागातील जलस्रोतांचे बळकटीकरण करून प्रत्येक कुटुंबाला पाणी कसे मिळेल? यासाठी प्रयत्न करायला हवेत. शेतशिवाराबरोबरच गावाचा शिवारदेखील स्वच्छ व सुंदर कसा होईल, यासाठी प्रयत्न करावेत. गावामध्ये शेतीविषयक विविध योजनांची आखणी करावी. गावाच्या सन्मानासाठी प्रत्येकाने शौचालयाचा नियमित वापर होण्यासाठी सरपंच मंडळींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी टाकसाळे यांनी केले.

यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार, गटविकास अधिकारी अनुप पाटील, विस्ताराधिकारी स्वप्निल पवार, शैलेंद्र पानपाटील, जी. एम. गोरे यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक आणि सरपंचांची उपस्थिती होती.