शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

घरकूल बांधकामांसाठी मिळेना वाळू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST

जिल्ह्यात वाढला धुळीचा त्रास परभणी : जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जिंतूर रोड, गंगाखेड रोड या रस्त्यांची ...

जिल्ह्यात वाढला धुळीचा त्रास

परभणी : जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जिंतूर रोड, गंगाखेड रोड या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ पसरली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने या मार्गावरही धूळ वाढली आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. एकीकडे खड्डे आणि दुसरीकडे धुळ यामुळे जिल्हावासियांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.

उद्यान विकासाची कामे शहरात ठप्प

परभणी : शहरातील उद्यानाच्या विकासाची कामे ठप्प पडली आहेत. नानलपेठ भागातील शिवाजी पार्क आणि गव्हाणे चौक भागातील नेहरू पार्क या दोन्ही उद्यानांची दुरवस्था झाली आहे. नेहरु पार्कच्या सुशोभिकरणासाठी मोठा खर्च करण्यात आला. मात्र केवळ देखभाल, दुरुस्ती अभावी या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे शिवाजी पार्क विकासासाठी निधी प्राप्त झालेला असताना येथील काम ठप्प आहे. दोन्ही उद्यानांची बकाल अवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचा हिरमोड होत आहे.

शाळांमध्ये वाढली विद्यार्थी संख्या

परभणी : जिल्ह्यात दोन आठवड्यापासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. मात्र आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शाळा नियमित सुरू झाल्या असून, काही शाळांनी हळूहळू नववीचे वर्गही सुरु केले आहेत. मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचा वापर करीत विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत.

वृक्षारोपण मोहिमेचे उद्दिष्ट अपूर्ण

परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने वृक्षलागवड मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. परिणामी जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. जिल्ह्यात यावर्षी ३ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जून आणि जुलै महिन्यात काही भागात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र त्यानंतर ही मोहीम बारगळली. परिणामी चांगला पाऊस झाल्यानंतरही जिल्ह्यात नवीन झाडांची संख्या वाढली नाही.