शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओंनी ५७ वाहने केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST

परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ...

परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ८० हजार रुपयांचा दंड वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.

वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने निमावली ठरवून दिली आहे. असे असतानाही अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने चालवीत असल्याची बाब उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत समोर आली. नोव्हेंबर महिन्यात या विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने विविध ठिकाणी ४८५ वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ४९ वाहनधारकांकडे कागदपत्रे नसणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे वाहन चालविणे आदी बाबींमध्ये वाहनधारक दोषी आढळून आले. यावेळी या वाहनधारकांकडून ९ लाख ८७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर १९ वाहने धोकादायकरीत्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले. ही वाहने पुन्हा रस्त्यावर धावल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन सदरील वाहने या पथकातील अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.

महिनाभरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २१० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५९ वाहनधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर ३८ वाहने या विभागातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. १८ वाहनांची नोंदणी निलंबित करण्यात आली असून दोषी आढळलेल्या वाहनधारकांकडून २ लाख ९३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.

लॉकडाऊनमध्येही वसुलीचा आलेख कायम

१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत आरटीओ कार्यालयाच्या वतीने ३५ लाख रुपयांचा दंड विविध माध्यमातून वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२१ अखेरपर्यंत या कार्यालयाला ९५ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८ महिन्यांत ३५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास ४२ टक्के वसुली करण्यात आली असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. २० मार्चपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतरच्या कालावधीत हे कार्यालय काही दिवस बंद होते. त्यानंतरही महसूल वसुलीची या कार्यालयाची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून येत आहे.