शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओंनी ५७ वाहने केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST

परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ...

परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ८० हजार रुपयांचा दंड वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.

वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने निमावली ठरवून दिली आहे. असे असतानाही अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने चालवीत असल्याची बाब उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत समोर आली. नोव्हेंबर महिन्यात या विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने विविध ठिकाणी ४८५ वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ४९ वाहनधारकांकडे कागदपत्रे नसणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे वाहन चालविणे आदी बाबींमध्ये वाहनधारक दोषी आढळून आले. यावेळी या वाहनधारकांकडून ९ लाख ८७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर १९ वाहने धोकादायकरीत्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले. ही वाहने पुन्हा रस्त्यावर धावल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन सदरील वाहने या पथकातील अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.

महिनाभरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २१० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५९ वाहनधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर ३८ वाहने या विभागातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. १८ वाहनांची नोंदणी निलंबित करण्यात आली असून दोषी आढळलेल्या वाहनधारकांकडून २ लाख ९३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.

लॉकडाऊनमध्येही वसुलीचा आलेख कायम

१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत आरटीओ कार्यालयाच्या वतीने ३५ लाख रुपयांचा दंड विविध माध्यमातून वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२१ अखेरपर्यंत या कार्यालयाला ९५ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८ महिन्यांत ३५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास ४२ टक्के वसुली करण्यात आली असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. २० मार्चपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतरच्या कालावधीत हे कार्यालय काही दिवस बंद होते. त्यानंतरही महसूल वसुलीची या कार्यालयाची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून येत आहे.