शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

आरटीओंनी ५७ वाहने केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST

परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ...

परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ८० हजार रुपयांचा दंड वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.

वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने निमावली ठरवून दिली आहे. असे असतानाही अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने चालवीत असल्याची बाब उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत समोर आली. नोव्हेंबर महिन्यात या विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने विविध ठिकाणी ४८५ वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ४९ वाहनधारकांकडे कागदपत्रे नसणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे वाहन चालविणे आदी बाबींमध्ये वाहनधारक दोषी आढळून आले. यावेळी या वाहनधारकांकडून ९ लाख ८७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर १९ वाहने धोकादायकरीत्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले. ही वाहने पुन्हा रस्त्यावर धावल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन सदरील वाहने या पथकातील अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.

महिनाभरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २१० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५९ वाहनधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर ३८ वाहने या विभागातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. १८ वाहनांची नोंदणी निलंबित करण्यात आली असून दोषी आढळलेल्या वाहनधारकांकडून २ लाख ९३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.

लॉकडाऊनमध्येही वसुलीचा आलेख कायम

१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत आरटीओ कार्यालयाच्या वतीने ३५ लाख रुपयांचा दंड विविध माध्यमातून वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२१ अखेरपर्यंत या कार्यालयाला ९५ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८ महिन्यांत ३५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास ४२ टक्के वसुली करण्यात आली असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. २० मार्चपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतरच्या कालावधीत हे कार्यालय काही दिवस बंद होते. त्यानंतरही महसूल वसुलीची या कार्यालयाची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून येत आहे.