शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

आरटीओंनी ५७ वाहने केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST

परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ...

परभणी : परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर चालणारी जिल्हाभरात ५७ वाहने जप्त करण्यात आली असून १२ लाख ८० हजार रुपयांचा दंड वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.

वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने निमावली ठरवून दिली आहे. असे असतानाही अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने चालवीत असल्याची बाब उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत समोर आली. नोव्हेंबर महिन्यात या विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने विविध ठिकाणी ४८५ वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ४९ वाहनधारकांकडे कागदपत्रे नसणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे वाहन चालविणे आदी बाबींमध्ये वाहनधारक दोषी आढळून आले. यावेळी या वाहनधारकांकडून ९ लाख ८७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर १९ वाहने धोकादायकरीत्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले. ही वाहने पुन्हा रस्त्यावर धावल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन सदरील वाहने या पथकातील अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.

महिनाभरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २१० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५९ वाहनधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर ३८ वाहने या विभागातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. १८ वाहनांची नोंदणी निलंबित करण्यात आली असून दोषी आढळलेल्या वाहनधारकांकडून २ लाख ९३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.

लॉकडाऊनमध्येही वसुलीचा आलेख कायम

१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत आरटीओ कार्यालयाच्या वतीने ३५ लाख रुपयांचा दंड विविध माध्यमातून वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२१ अखेरपर्यंत या कार्यालयाला ९५ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८ महिन्यांत ३५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास ४२ टक्के वसुली करण्यात आली असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. २० मार्चपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतरच्या कालावधीत हे कार्यालय काही दिवस बंद होते. त्यानंतरही महसूल वसुलीची या कार्यालयाची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून येत आहे.