शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक :रोहयोची कामे न करणाऱ्यांना निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:27 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, सीईओं बी.पी.पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा विषय चर्चेला आला. त्यावेळी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे लोकांकडून कामांची मागणी केली जात आहे.या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहेत. लोकप्रतिनिधी, पत्रकार आम्हाला प्रश्न विचारत आहेत. तुम्ही काय करीत आहात, असा सवाल यावेळी भापकर यांनी केला. एप्रिल महिन्यापासून जवळपास २० हजार विहिरींचे प्रस्ताव दाखल आहेत. त्यातील बहुतांश कामे सुरुच नाहीत. किमान ७ हजार विहिरींची कामे उन्हाळ्यामध्ये होणे अपेक्षित आहे.रोहयोची कामे ग्रामपातळीवर सुरु न करणाºया ग्रामसेवकांना निलंबित करा व निष्क्रियता दाखविणाºया सरपंचांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सादर करा, असे आदेशही यावेळी भापकर यांनी यावेळी दिले. ३० आॅक्टोबर रोजी राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यावेळेसपासून आतापर्यंत रोहयोची कामे सुरु करण्यासंदर्भात का उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, याचा जाब यावेळी भापकर यांनी उपस्थित अधिकाºयांना विचारला. यातील कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.कृषी अधीक्षक कुठे गायब होतात ?४या आढावा बैठकीत भापकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते जनतेला भेटत नाहीत, अधिकाºयांच्या बैठकीला येत नाहीत, आजच्या बैठकीलाही उपस्थित नाहीत, ते नेमके असतात कुठे, असा सवाल यावेळी भापकर यांनी केला. जेथे आवश्यकता आहे तेथे तातडीने पाण्याचे टँकर सुरु करा व गरजेनुसार चाºयाची उपलब्धता करुन द्या, असेही यावेळी भापकर म्हणाले.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी