शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांकडून नोंदणी सुरू; ८ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

परभणी : जिल्ह्यात दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीच्या उपलब्ध जागा अधिक असल्याने जवळपास ७ ते ८ हजार जागा यावर्षी ...

परभणी : जिल्ह्यात दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीच्या उपलब्ध जागा अधिक असल्याने जवळपास ७ ते ८ हजार जागा यावर्षी रिक्त राहण्याची शक्यता आहे.

दहावीचा निकाल १६ जुलै रोजी लागला. त्यानंतर आता कुठे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू केली आहे. जिल्ह्यात यावर्षी २८ हजार ४२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या तुलनेत जिल्ह्यात अकरावीच्या एकूण ३७ हजार १२० जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक उत्तीर्ण विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला तरी ८ हजार ६९७ जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात हा प्रश्न उपस्थित राहणार आहे.

मोठ्या महाविद्यालयांत गुणवत्ता यादी लागणार

जिल्ह्यात ११ वीच्या एकूण जागा जास्त व दहावीची विद्यार्थी संख्या कमी अशी स्थिती असली तरी मोठ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मात्र प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी लागणार आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेची ही स्थिती आहे. कला शाखेत थेट प्रवेश मिळत आहेत.

प्राचार्य म्हणतात...

यावर्षी पहिल्यांदाच १० वीचा निकाल १०० टक्के लागल्याने प्रवेश अर्ज जास्त व ११ वीमधील जागा कमी असे समीकरण असणार आहे. यासाठी महाविद्यालयाला प्रवेश मागणीनुसार तात्पुरत्या स्वरूपात क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश घेण्यासाठी तुकडीवाढ मंजूर करणे गरजेचे आहे.

- डॉ. शरद कुलकर्णी, सेलू

११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गुणवत्तेचा निकष लावला जाणार आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश झाला असे समजू नये. मागणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने सुधारित धोरण लागू करावे.

- रमेश नखाते, वालूर