शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

रेशनकार्डधारकांच्या तपासणीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:34 IST

जिल्ह्यातील रेशनचा काळा बाजार थांबावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यालाच मिळावा, या उद्देशाने जिल्हा पुरवठा विभागाने रेशनकार्डधारकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व रेशनकार्ड धारकांची माहिती नव्याने संकलित करण्यात आली आहे़ आता या माहितीचे वर्गीकरण केले जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील रेशनचा काळा बाजार थांबावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यालाच मिळावा, या उद्देशाने जिल्हा पुरवठा विभागाने रेशनकार्डधारकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व रेशनकार्ड धारकांची माहिती नव्याने संकलित करण्यात आली आहे़ आता या माहितीचे वर्गीकरण केले जाणार आहे़अन्नधान्याच्या वितरणामध्ये पारदर्शकपणा आणण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविली जात आहे़ १६ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या तपासणीला प्रारंभ झाला आहे़ २४ नोव्हेंबरपर्यंत तलाठ्यांमार्फत जिल्हाभरात ही तपासणी केली जाणार आहे़ त्यासाठी प्रत्येक तलाठ्यांना डी-१ नावाचे रजिस्टर दिले असून, या रजिस्टरमध्ये नमूद केलेल्या तक्त्यानुसार माहिती संकलित करून शिधापत्रिका धारकांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे़ यासाठी तहसील कार्यालयात तलाठ्यांची बैठक नुकतीच पार पडली़ तलाठ्यांना या मोहिमेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले़१७ व १८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांनी प्रत्यक्ष गावांत जाऊन शिधापत्रिकाधारकांच्या भेट घेतल्या़ या ठिकाणी शिधापत्रिकांचे नाव, गाव, दुबार नोंदणी झाली असेल तर त्याची माहिती, स्थलांतरित असल्यास त्याची माहिती किंवा लग्न होवून परगावी गेलेल्या महिला व स्थलांतरित सदस्यांची माहिती घेण्यात आली असून, अशा माहितीची नोंद लाल शाईने करण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे शिधापत्रिका धारकांकडे गॅस सिलेंडर आहे का? आधारकार्ड आहेत का? असल्यास त्याची सत्यप्रत मिळविण्याचे काम करण्यात आले आहे का? ग्रामीण भागात हे काम पूर्ण झाले असून, २० व २१ नोव्हेंबर रोजी शहरी भागामध्ये प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकांची भेट घेतली जाणार आहे़ शहरी भागातील लाभधारकांचीही माहिती याच पद्धतीने संकलित करण्यात येणार आहे़ १९ नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तलाठ्यांनी व २२ नाव्हेंबर रोजी शहरी भागातील तलाठ्यांनी या तपासणीचा अहवाल तहसील कार्यालयास सादर करावयाचा आहे़अन्नधान्याच्या वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे आधार लिंक करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आह़े त्यामुळे आता या प्रक्रियेत कितपत पारदर्शकता येते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़आधार लिंक : ७० टक्के काम पूर्ण४सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत आधार लिंक असेल तरच संबंधित लाभार्थी कुटूंबाला अन्नधान्याचा पुरवठा होत आहे़ सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित होत आहे़ या प्रणालीद्वारे धान्य मिळविण्यासाठी कुटूंबातील किमान सदस्याचे आधार लिंक असणे गरजेचे आहे़ ई-पॉसशिवाय धान्य वितरण करण्यास बंदी घातली आहे़ त्यामुळे सर्व रेशन दुकानदारांना आधार लिंकद्वारेच धान्य वितरित करावे लागणार आहे़ जिल्ह्यात जवळपास १२ लाख लाभार्थी असून, आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांचे आधार क्रमांक पुरवठा विभागाने मिळविले आहेत़