शहरं
Join us  
Trending Stories
1
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
2
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
3
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
6
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
7
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
8
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
9
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
10
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
11
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
12
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
13
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
14
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
15
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
16
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
17
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
18
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
19
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
20
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा

मालवाहतूकीमुळे रापमची एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून वारंवार संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागत ...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून वारंवार संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. यावर उपाय म्हणून एसटीने प्रवासी वाहतुकीबरोबरच व्यावसायिक माल वाहतुकीलाही सुरुवात केली आहे. सध्या परभणी विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारांमध्ये २५ मालवाहतूक बस आहेत. या मालवाहतूक बसमधून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढीस हातभार लागत आहे. २२ मार्च २०२० ते २७ मे २०२१ या कालावधीत २५ बसेसच्या माध्यमातून १ हजार ८६२ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. त्यासाठी २ लाख २९ हजार २४४ किमीचे अंतर कापण्यात आले आहे. यातून एसटी महामंडळाला ९३ लाख ७० हजार ८१५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, मालवाहतूक बस घेऊन जाणाऱ्या चालकांना परजिल्ह्यामध्ये दोन ते तीन दिवस मुक्काम करावा लागतो. त्यासाठी एसटी महामंडळाकडून कोणतीही सुविधा पुरवण्यात आलेली नाही. उलट स्वखर्चातून दोन ते तीन दिवसांची बस चालकाला गुजराण करावी लागते. त्यामुळे एकीकडे संचारबंदीच्या काळात माल वाहतुकीतून एसटी मालामाल होत असली तरी चालक मात्र कंगाल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देऊन चालकांना मोफत राहण्याची व खाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

कोरोना काळात ९४ लाख रुपयांची कमाई

मागील वर्षभरापासून परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातही आगारांतील प्रवासी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे एसटी महामंडळ मालवाहतूक बसमधून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. वर्षभराच्या कालावधीत १ हजार ८६२ फेऱ्या मालवाहतूक बसने पूर्ण केल्या आहेत. त्यामधून २ लाख २९ हजार २०६ किमीचे अंतर पार केले आहे. यातून प्रतिकिमी ४०.८७ प्रमाणे ९३ लाख ७० हजार ८१५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या मालवाहतूक बसने संचार बंदीच्या काळात वर्षभरात ९४ लाख रुपयांची कमाई केली आहे.

परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

सध्या मध्यवर्ती कार्यालयाप्रमाणे जिल्हास्तरावर मालवाहतुकीसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्याच्यावर जिल्ह्यातील मालवाहतुकीची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये कृषी, अन्न प्रक्रिया केलेल्या मालासह अन्य महामंडळांच्या गोदामातील मालाची वाहतूक प्राधान्याने करण्यात येते. सध्या बाजारामध्ये असलेल्या मालवाहतुकीच्या दराप्रमाणे एसटी आपले दर आकारत आहे. या मालवाहतुकीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही दिवसांपासून ही मालवाहतूक चालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. परजिल्ह्यातून माल घेऊन गेलेली गाडी पाच ते सहा दिवस परत येत नाही. त्या ठिकाणावरून लवकर माल मिळत नसल्याने अडचण निर्माण होत निर्माण होत आहे. त्यामुळे चालकांनाही परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत संबंधित आगारात मुक्काम ठोकावा लागतो. त्यासाठी लागणारा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे.

ॲडव्हान्स मिळतो. मात्र, पगारातून होतो कट

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयअंतर्गत येणाऱ्या ७ आगारांमधून मालवाहतूक केली जाते. तसेच इतर जिल्ह्यात गेल्यानंतर परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत संबंधित चालकाला त्या ठिकाणी थांबावे लागते. त्यासाठी एसटी महामंडळाकडून ५०० च्या पटीत ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, ॲडव्हान्सची रक्कम आगामी पगारामधून कपात केली जाते. त्यामुळे संचारबंदीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या चालकांना एसटी महामंडळाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे दिसून येत आहे.