शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पावसाचा कहर, आतापर्यंत १ हजार मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:19 IST

परभणी : जिल्ह्यात यावर्षी पावसाने कहर केला असून, मागील पाच दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने गोदावरी, पूर्णा, दुधना या ...

परभणी : जिल्ह्यात यावर्षी पावसाने कहर केला असून, मागील पाच दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांसह ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७६१ मि.मी. पाऊस होतो. यंदा मात्र रविवारपर्यंत तब्बल १ हजार १३ मि.मी. पाऊस पडला आहे.

यावर्षी पावसाळ्यात जून महिन्यापासूनच पाऊस होत आहे. प्रत्येक महिन्यात पावसाची नोंद होत असून, यावर्षीची सरासरी पावसाने कधीच ओलांडली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच १ हजार मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाथरी, सेलू, मानवत आणि पालम या चार तालुक्यांत १ हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. रविवारी धुवाधार पावसाने हजेरी लावली. जिंतूर तालुक्यातील येलदरी व परिसरात सतत होत असलेल्या पावसामुळे केहाळ गावाजवळील ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पालम तालुक्यातील लेंडी नदीला २५ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या पावसाने पूर आला. यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला होता. २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तरी संपर्क पूर्ववत झाला नव्हता. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू शिवारात मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला.

दरम्यान, जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. दैठणा, पोखर्णी, ताडकळस, एरंडेश्वर, बनवस, गंगाखेड तालुक्यातील खळी व अन्य गावांमध्ये पाऊस पडला. सतत होत असलेल्या पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली आहे.

ढालेगाव, डिग्रस बंधाऱ्यातून विसर्ग

पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याचे ८ दरवाजे उघडून ५८ हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्याचप्रमाणे पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे ३ दरवाजे उघडून ७४ हजार ८३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे. येलदरी प्रकल्पाच्या दहाही दरवाजांतून रविवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे.