शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

३४ हजार हेक्टरवरील सिंचनावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:18 IST

देवगाव फाटा : निम्न दुधना प्रकल्पाचा जालना जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाने चार वर्षानंतर प्रथमच १०० टक्के पाणी साठा ...

देवगाव फाटा : निम्न दुधना प्रकल्पाचा जालना जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाने चार वर्षानंतर प्रथमच १०० टक्के पाणी साठा या धारणात झाला आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाने डावा व उजव्या कालवा व चाऱ्याचे काम अर्धवट राहिल्याने प्रस्ताव ३४ हजार हेक्टर सिंचन क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वपक्षीय संघटनांच्या लढ्यानंतर ३० मे १९७९ मध्ये शासनाने निम्न दुधना प्रकल्पास मंजुरी दिली. मात्र हा प्रकल्प निधी तरतुदींच्या अडथळ्यात तीन दशके गुंतला गेला होता. २००८ मध्ये सुधारित आर्थिक तरतुदीनंतर अडथळ्यांची शर्यत संपली आणि तिसऱ्या दशकात हा प्रकल्प पूर्णत्वास गेला होता. २०१० मध्ये थळ भरणी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या धरणात पाणी साठवण होऊ लागली. प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे ४ हजार ६५ चौरस किमीचे आहे. येथून डावा व उजवा कालवा काढण्यात आला. या अंतर्गत सेलू, जिंतूर, मानवत व परभणी तालुक्यातील ३४ हजार हेक्टर सिंचनासाठी प्रस्तावित केले होते. २८ एप्रिल २०१६ रोजी हे निम्न दुधना धरण पहिल्यांदा पूर्ण भरले होते. त्यावेळी ४२.५५ दलघमी अतिरिक्त पाणी दुधना नदीपात्रात सोडले होते. त्यानंतर अतिरिक्त पाणी धरणात सोडण्याची वेळ आली नव्हती. बहुतांश वेळा हे धरण मृतसाठ्यातच राहिले. सप्टेंबर २०२० मध्ये या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने २०१६ नंतर दुसऱ्यांदा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले. पंतप्रधान सिंचाई योजनेंतर्गत प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी २०१८-१९ मध्ये २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर २०१७-१८ मध्ये २७ कोटी २८ लाख असा एकूण ५२ कोटी २८ लाखांच्या निधीतून या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामावर १७ कोटी ३९ लाख रुपये खर्च केले गेले. परंतु, त्यानंतर हे काम अर्धवट राहिले गेले. ते प्रशासन आणि ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी शेवटपर्यंत जाईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे ३४ हजार हेक्टरवरील सिंचनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तुटफूट वाढली

विशेष म्हणजे डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम करताना सिमेंट आणि वाळूचा वापर कमी झाल्याने ठिक ठिकाणी फरशा निखळल्या आहेत. काही भाग खचला आहे. सद्यस्थितीत या कालव्यात झाडेझुडपे काढण्याचा प्रयत्न केला असला तरी गेटच्या लोखंडी दारांची तुटफूट झाली आहे. प्रशासनाने डाव्या व उजव्या कालव्याच्या कामासह चाऱ्याचे काम पूर्ण केल्यानंतर या भागातील शेती सुजलाम् सुफलाम् होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.