शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

३४ हजार हेक्टरवरील सिंचनावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:18 IST

देवगाव फाटा : निम्न दुधना प्रकल्पाचा जालना जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाने चार वर्षानंतर प्रथमच १०० टक्के पाणी साठा ...

देवगाव फाटा : निम्न दुधना प्रकल्पाचा जालना जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाने चार वर्षानंतर प्रथमच १०० टक्के पाणी साठा या धारणात झाला आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाने डावा व उजव्या कालवा व चाऱ्याचे काम अर्धवट राहिल्याने प्रस्ताव ३४ हजार हेक्टर सिंचन क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वपक्षीय संघटनांच्या लढ्यानंतर ३० मे १९७९ मध्ये शासनाने निम्न दुधना प्रकल्पास मंजुरी दिली. मात्र हा प्रकल्प निधी तरतुदींच्या अडथळ्यात तीन दशके गुंतला गेला होता. २००८ मध्ये सुधारित आर्थिक तरतुदीनंतर अडथळ्यांची शर्यत संपली आणि तिसऱ्या दशकात हा प्रकल्प पूर्णत्वास गेला होता. २०१० मध्ये थळ भरणी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या धरणात पाणी साठवण होऊ लागली. प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे ४ हजार ६५ चौरस किमीचे आहे. येथून डावा व उजवा कालवा काढण्यात आला. या अंतर्गत सेलू, जिंतूर, मानवत व परभणी तालुक्यातील ३४ हजार हेक्टर सिंचनासाठी प्रस्तावित केले होते. २८ एप्रिल २०१६ रोजी हे निम्न दुधना धरण पहिल्यांदा पूर्ण भरले होते. त्यावेळी ४२.५५ दलघमी अतिरिक्त पाणी दुधना नदीपात्रात सोडले होते. त्यानंतर अतिरिक्त पाणी धरणात सोडण्याची वेळ आली नव्हती. बहुतांश वेळा हे धरण मृतसाठ्यातच राहिले. सप्टेंबर २०२० मध्ये या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने २०१६ नंतर दुसऱ्यांदा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले. पंतप्रधान सिंचाई योजनेंतर्गत प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी २०१८-१९ मध्ये २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर २०१७-१८ मध्ये २७ कोटी २८ लाख असा एकूण ५२ कोटी २८ लाखांच्या निधीतून या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामावर १७ कोटी ३९ लाख रुपये खर्च केले गेले. परंतु, त्यानंतर हे काम अर्धवट राहिले गेले. ते प्रशासन आणि ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी शेवटपर्यंत जाईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे ३४ हजार हेक्टरवरील सिंचनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तुटफूट वाढली

विशेष म्हणजे डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम करताना सिमेंट आणि वाळूचा वापर कमी झाल्याने ठिक ठिकाणी फरशा निखळल्या आहेत. काही भाग खचला आहे. सद्यस्थितीत या कालव्यात झाडेझुडपे काढण्याचा प्रयत्न केला असला तरी गेटच्या लोखंडी दारांची तुटफूट झाली आहे. प्रशासनाने डाव्या व उजव्या कालव्याच्या कामासह चाऱ्याचे काम पूर्ण केल्यानंतर या भागातील शेती सुजलाम् सुफलाम् होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.