शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नागपूर-मुंबई मार्गाच्या धर्तीवरच परभणीतून जाणाऱ्या समृद्धीचा मावेजा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 18:43 IST

नागपूर-मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. या महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

परभणी : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर रेडी रेकनर दराच्या पाचपट्टीने परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली असल्याची माहिती आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

नागपूर-मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. या महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हा महामार्ग परभणी जिल्ह्यातील ४४ गावांमधून जाणार आहे. यासंदर्भातील आदेश ६ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने काढला आहे. तसेच याबाबतची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा या चार तालुक्यांमधून हा महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. सदरील भूसंपादनाचा मावेजा संबंधित शेतकऱ्यांना मिळण्याबाबत विविध चर्चा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर सुरू होत्या. याबाबत आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. या अनुषंगाने उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादनाचा मोबदला दिला जाणार आहे. रेडी रेकनर दराच्या पाचपट यासंदर्भातील मोबदला देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसलाही गैरसमज निर्माण करून घेऊ नये, असे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली असल्याचे आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले. त्यामुळे आता जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामहामार्गाच्या जमिनीच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या शंका दूर झाल्या आहेत, असेही आमदार पाटील म्हणाले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गparabhaniपरभणी