शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन १३२ केव्ही केंद्रांचा प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

परभणी जिल्ह्याला औष्णिक विद्युत केंद्रातून वीज पुरवठा होतो. उपलब्ध झालेली वीज उपकेंद्रांच्या क्षमतेप्रमाणे वहनांद्वारे वितरित करण्याचे महत्त्वाचे काम १३२ ...

परभणी जिल्ह्याला औष्णिक विद्युत केंद्रातून वीज पुरवठा होतो. उपलब्ध झालेली वीज उपकेंद्रांच्या क्षमतेप्रमाणे वहनांद्वारे वितरित करण्याचे महत्त्वाचे काम १३२ केव्ही केंद्रांमधून केले जाते. परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीला असे सहा केंद्र उपलब्ध आहेत. परभणी, जिंतूर, सोनपेठ, पूर्णा, पाथरी आणि गंगाखेड येथून या केंद्राच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था राबविली जाते. परंतु, मागील काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सद्यस्थितीला कृषी, घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य अशा चार गटांमध्ये २ लाख ८० हजार वीज ग्राहक विजेचा वापर करतात. या ग्राहकांना वीज पुरवठा करताना महावितरणला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत प्रत्येकाच्या घरी वीज जोडणी देण्याच्या योजना आखल्या जात आहेत. सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांसाठी महावितरणने वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकीकडे खेडोपाडी वीज पुरवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे साधन सामग्री वाढविण्यासाठी मात्र प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये सहा १३२ केव्ही केंद्र आणि ३३ केव्हीची ७८ उपकेंद्र आहेत. या केंद्रांमधून ग्राहकांपर्यंत विजेचे वितरण केले जाते. परंतु, जिल्ह्यातील विजेची मागणी लक्षात घेता १३२ केव्ही वीज केंद्राची संख्या अपुरी पडत आहे. या केंद्रांमधून वीज वितरण करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विजेचा दाब कमी- अधिक होतो. परिणामी वीज पुरवठा विसकळीत होण्याचे प्रमाण वाढत जाते. ग्राहकांना सुरळीत वीज मिळत नसल्याने ओरड वाढत चालली आहे. मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात विजेच्या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारी असतानाही प्रशासनाकडून मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी जिल्ह्यामध्ये ग्राहकांना वीज पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे. वीज वितरण कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव मंजूर झाल्यास जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता आहे.

मागणी वाढल्याने यंत्रणेवर ताण

मागील काही वर्षांच्या तुलनेत विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वीज ग्राहकांची संख्या तर वाढलीच आहे. याशिवाय ग्राहकांकडून विजेचा वापरही दुपटीने वाढला आहे. काही कामे विजेशिवाय होत नसल्याने दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत चालली आहे. ग्राहकांची ही मागणी पुरवणारी यंत्रणा मात्र जुनीच आहे. या यंत्रणेत सुधारणा करणे आवश्यक असताना वेळोवेळी ही सुधारणा झाली नाही. मागणीच्या तुलनेत यंत्रणा वाढविणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वीज वितरणावर ताण येत आहे.