शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

कार्यक्रम प्रशासनाचा, जुंपली ग्रामस्थांमध्ये; पेडगाव येथील प्रकार

By मारोती जुंबडे | Updated: December 17, 2023 18:28 IST

अधिकारी आल्या पावली परतले

परभणी: विकसित भारत संकल्प यात्रा अभियान अंतर्गत पेडगाव येथे प्रशासनाकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रशासन लवाजम्यासह गावात धडकले. महिलांसह ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने कार्यक्रमास्थळी जमा झाले. मात्र स्थानिक ग्रामस्थांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर धक्काबुकीत झाल्याने गोंधळ वाढला, अखेर हा कार्यक्रम रद्द करून प्रशासन आल्यापावली शहराकडे परतले. त्यामुळे कार्यक्रम प्रशासनाचा अन् जुंपली ग्रामस्थांमध्ये असाच काहीसा प्रकार पेडगाव येथे रविवारी घडला.

विविध योजना अंतर्गत पात्र असलेले परंतु लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात २४ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जाऊन लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. या अनुषंगाने तालुका प्रशासनाने ही जोरदार तयारी केली आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने रविवारी सकाळी पेडगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी केंद्राचे उपसचिव गिरी हे उपस्थित राहणार होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे डॉ. संदीप घोन्सीकर, गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्यासह अधिकारी व कर्मचारी हजर झाले. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. खुर्च्यांसह इतर व्यवस्थाही करण्यात आली काही. हा कार्यक्रम सुरू होणार तेवढ्यात दोन ग्रामस्थांमध्ये सेल्फी पॉईंटवरुन वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. प्रशासनालाही सूचनेना आपण काय करावे, त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करून आल्या पावली प्रशासन माघारी फिरल्याने अखेर हा गोंधळ थांबला.

शनिवारी उमरी तर रविवारी पेडगावात गोंधळविकसित भारत संकल्प यात्रा अभियान हा कार्यक्रम गरजू लोकांना लाभ पोहोचण्यासाठी आहे की एका पक्षाचा प्रचार प्रसारासाठी आहे, अशी शंका उपस्थित करत परभणी तालुक्यातील जोडपरळी, पोखर्णी येथे वाद झाला होता. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. परंतु शनिवारी उमरी येथे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर रविवारी सकाळी पेडगाव येथील कार्यक्रमही गोंधळामुळे प्रशासनाला रद्द करून माघारी फिरावे लागले. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली शंका का? दूर करत नसेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या गोंधळाबाबत पंचायत समिती प्रशासनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.

केंद्रीय उपसचिव गिरी राहणार होते उपस्थितप्रशासनाने ही या कार्यक्रमासाठी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास आधिकारी,सीडिपीओ यांना कार्यक्रमातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून दिली. त्यानंतर सकाळी ८:३० वाजता पेडगाव येथे उपस्थित राहण्याचे आदेशही दिले. त्या अनुषंगाने गावांमध्येही कार्यक्रमाचे स्टेज उभारून जोरदार तयारी करण्यात आली. प्रत्येक योजनेची आकडेवारी स्व:ता जवळ ठेवण्याची सुचनाही करण्यात आली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय उपसचिव गिरी यांची उपस्थिती राहणार होती.

टॅग्स :parabhaniपरभणी