शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

कार्यक्रम प्रशासनाचा, जुंपली ग्रामस्थांमध्ये; पेडगाव येथील प्रकार

By मारोती जुंबडे | Updated: December 17, 2023 18:28 IST

अधिकारी आल्या पावली परतले

परभणी: विकसित भारत संकल्प यात्रा अभियान अंतर्गत पेडगाव येथे प्रशासनाकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रशासन लवाजम्यासह गावात धडकले. महिलांसह ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने कार्यक्रमास्थळी जमा झाले. मात्र स्थानिक ग्रामस्थांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर धक्काबुकीत झाल्याने गोंधळ वाढला, अखेर हा कार्यक्रम रद्द करून प्रशासन आल्यापावली शहराकडे परतले. त्यामुळे कार्यक्रम प्रशासनाचा अन् जुंपली ग्रामस्थांमध्ये असाच काहीसा प्रकार पेडगाव येथे रविवारी घडला.

विविध योजना अंतर्गत पात्र असलेले परंतु लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात २४ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जाऊन लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. या अनुषंगाने तालुका प्रशासनाने ही जोरदार तयारी केली आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने रविवारी सकाळी पेडगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी केंद्राचे उपसचिव गिरी हे उपस्थित राहणार होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे डॉ. संदीप घोन्सीकर, गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्यासह अधिकारी व कर्मचारी हजर झाले. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. खुर्च्यांसह इतर व्यवस्थाही करण्यात आली काही. हा कार्यक्रम सुरू होणार तेवढ्यात दोन ग्रामस्थांमध्ये सेल्फी पॉईंटवरुन वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. प्रशासनालाही सूचनेना आपण काय करावे, त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करून आल्या पावली प्रशासन माघारी फिरल्याने अखेर हा गोंधळ थांबला.

शनिवारी उमरी तर रविवारी पेडगावात गोंधळविकसित भारत संकल्प यात्रा अभियान हा कार्यक्रम गरजू लोकांना लाभ पोहोचण्यासाठी आहे की एका पक्षाचा प्रचार प्रसारासाठी आहे, अशी शंका उपस्थित करत परभणी तालुक्यातील जोडपरळी, पोखर्णी येथे वाद झाला होता. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. परंतु शनिवारी उमरी येथे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर रविवारी सकाळी पेडगाव येथील कार्यक्रमही गोंधळामुळे प्रशासनाला रद्द करून माघारी फिरावे लागले. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली शंका का? दूर करत नसेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या गोंधळाबाबत पंचायत समिती प्रशासनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.

केंद्रीय उपसचिव गिरी राहणार होते उपस्थितप्रशासनाने ही या कार्यक्रमासाठी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास आधिकारी,सीडिपीओ यांना कार्यक्रमातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून दिली. त्यानंतर सकाळी ८:३० वाजता पेडगाव येथे उपस्थित राहण्याचे आदेशही दिले. त्या अनुषंगाने गावांमध्येही कार्यक्रमाचे स्टेज उभारून जोरदार तयारी करण्यात आली. प्रत्येक योजनेची आकडेवारी स्व:ता जवळ ठेवण्याची सुचनाही करण्यात आली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय उपसचिव गिरी यांची उपस्थिती राहणार होती.

टॅग्स :parabhaniपरभणी