शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

बेसुमार वाळू उपशाने वाढल्या समस्या

By admin | Updated: December 1, 2014 14:59 IST

मागील काही वर्षांपासून नदीपात्रातील वाळू उमस्याने समस्यांना उभारी दिली आहे. पाणी आणि रस्त्यांची समस्या बिकट झाली.

उद्धव चाटे /गंगाखेड

परभणी- गोदावरी, दुधना, पूर्णा, वाण, करपरा या नद्यांनी परभणी जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केले. कसदार जमीन आणि आश्‍वासित जलस्त्रोत यामुळे जिल्ह्याच्या वैभवात भरच पडली. परंतु, मागील काही वर्षांपासून नदीपात्रातील वाळू उमस्याने समस्यांना उभारी दिली आहे. पाणी आणि रस्त्यांची समस्या बिकट झाली. महसूल प्रशासनाला वाळू ठेक्यातून मोठा महसूल मिळला असला तरी त्याच्या कितीतरी पटीत नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे बेसुमार वाळू उपस्याला लगाम घालण्यासाठी वेळीच पाऊले उलण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाभरातील वाळू उपसा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या याचा हा आढावा.
गोदावरी काठावरील झोला, खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, धारखेड, नागठाणा, महातपुरी, आनंदवाडी, भांबरवाडी, दुसलगाव, मैराळ सावंगी, मसला, पिंपरी झोला या ठिकाणच्या नदी पात्रातून वाळूची तस्करी होत आहे. याचा त्रास शेतकरी व परिसरातील नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. शहराजवळील गोदावरील रेल्वे पुलाजवळही छोट्या-मोठय़ा वाळू तस्कराने थैमान घातले आहे. २0१३-१४ साठी तालुक्यात लिलाव झाले होते. नियमानुसार ३0 सप्टेंबर रोजी या लिलावाची मुदत संपली आहे. परंतु, गोदावरी पात्र कोरडे पडल्याने वाळू तस्करांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात महसूल प्रशासनाने ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी आदी वाहनांवर कारवाई करुन वाळू तस्करांकडून तीन लाखांचा दंड वसूल केला असला तरी मोठय़ा कारवाईची गरज आहे. निर्ढावलेल्या वाळू तस्करांवर लगाम बसला नाही तर अनर्थ होण्याची शक्यता जनतेतून ऐकावयास मिळत आहे. 
भरमसाठ वाळू भरुन वाहने गोदापात्रातून नेली जातात. नियम डावलून उपसा होतो. परंतु, प्रशासन मात्र कारवाई करीत नाही. 
गोदावरी पात्रातून वाळू उपस्याला लगाम बसावा, यासाठी पात्रात मालवाहतूक करणारे ट्रॅक, ट्रॅक्टर, टिप्पर या सारख्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, २१ नोव्हेंबरपासून लागू केले आहेत, अशी माहिती तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी दिली. गंगाखेड शहरालगतचे ओसाड पडलेले गोदावरी पात्र सामान्यांना होतोय त्रास
> वाळू वाहतुकीमुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. वाळू वाहतूक करणारे वाहन ज्या रस्त्याने नेले जाते. ते रस्ते खराब झाले आहेत. ग्रामस्थांच्या दररोजच्या वाहतुकीचे हे रस्ते खड्डे पडून चाळणी झाले आहेत. वाळू उपस्यामुळे गावातील विहिरी व हातपंपांच्या पाणी पातळीवरही परिणाम होत आहे.
सिंह यांनी घालावे लक्ष
> वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे