शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

बेसुमार वाळू उपशाने वाढल्या समस्या

By admin | Updated: December 1, 2014 14:59 IST

मागील काही वर्षांपासून नदीपात्रातील वाळू उमस्याने समस्यांना उभारी दिली आहे. पाणी आणि रस्त्यांची समस्या बिकट झाली.

उद्धव चाटे /गंगाखेड

परभणी- गोदावरी, दुधना, पूर्णा, वाण, करपरा या नद्यांनी परभणी जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केले. कसदार जमीन आणि आश्‍वासित जलस्त्रोत यामुळे जिल्ह्याच्या वैभवात भरच पडली. परंतु, मागील काही वर्षांपासून नदीपात्रातील वाळू उमस्याने समस्यांना उभारी दिली आहे. पाणी आणि रस्त्यांची समस्या बिकट झाली. महसूल प्रशासनाला वाळू ठेक्यातून मोठा महसूल मिळला असला तरी त्याच्या कितीतरी पटीत नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे बेसुमार वाळू उपस्याला लगाम घालण्यासाठी वेळीच पाऊले उलण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाभरातील वाळू उपसा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या याचा हा आढावा.
गोदावरी काठावरील झोला, खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, धारखेड, नागठाणा, महातपुरी, आनंदवाडी, भांबरवाडी, दुसलगाव, मैराळ सावंगी, मसला, पिंपरी झोला या ठिकाणच्या नदी पात्रातून वाळूची तस्करी होत आहे. याचा त्रास शेतकरी व परिसरातील नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. शहराजवळील गोदावरील रेल्वे पुलाजवळही छोट्या-मोठय़ा वाळू तस्कराने थैमान घातले आहे. २0१३-१४ साठी तालुक्यात लिलाव झाले होते. नियमानुसार ३0 सप्टेंबर रोजी या लिलावाची मुदत संपली आहे. परंतु, गोदावरी पात्र कोरडे पडल्याने वाळू तस्करांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात महसूल प्रशासनाने ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी आदी वाहनांवर कारवाई करुन वाळू तस्करांकडून तीन लाखांचा दंड वसूल केला असला तरी मोठय़ा कारवाईची गरज आहे. निर्ढावलेल्या वाळू तस्करांवर लगाम बसला नाही तर अनर्थ होण्याची शक्यता जनतेतून ऐकावयास मिळत आहे. 
भरमसाठ वाळू भरुन वाहने गोदापात्रातून नेली जातात. नियम डावलून उपसा होतो. परंतु, प्रशासन मात्र कारवाई करीत नाही. 
गोदावरी पात्रातून वाळू उपस्याला लगाम बसावा, यासाठी पात्रात मालवाहतूक करणारे ट्रॅक, ट्रॅक्टर, टिप्पर या सारख्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, २१ नोव्हेंबरपासून लागू केले आहेत, अशी माहिती तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी दिली. गंगाखेड शहरालगतचे ओसाड पडलेले गोदावरी पात्र सामान्यांना होतोय त्रास
> वाळू वाहतुकीमुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. वाळू वाहतूक करणारे वाहन ज्या रस्त्याने नेले जाते. ते रस्ते खराब झाले आहेत. ग्रामस्थांच्या दररोजच्या वाहतुकीचे हे रस्ते खड्डे पडून चाळणी झाले आहेत. वाळू उपस्यामुळे गावातील विहिरी व हातपंपांच्या पाणी पातळीवरही परिणाम होत आहे.
सिंह यांनी घालावे लक्ष
> वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे