शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार वाळू उपशाने वाढल्या समस्या

By admin | Updated: December 1, 2014 14:59 IST

मागील काही वर्षांपासून नदीपात्रातील वाळू उमस्याने समस्यांना उभारी दिली आहे. पाणी आणि रस्त्यांची समस्या बिकट झाली.

उद्धव चाटे /गंगाखेड

परभणी- गोदावरी, दुधना, पूर्णा, वाण, करपरा या नद्यांनी परभणी जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केले. कसदार जमीन आणि आश्‍वासित जलस्त्रोत यामुळे जिल्ह्याच्या वैभवात भरच पडली. परंतु, मागील काही वर्षांपासून नदीपात्रातील वाळू उमस्याने समस्यांना उभारी दिली आहे. पाणी आणि रस्त्यांची समस्या बिकट झाली. महसूल प्रशासनाला वाळू ठेक्यातून मोठा महसूल मिळला असला तरी त्याच्या कितीतरी पटीत नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे बेसुमार वाळू उपस्याला लगाम घालण्यासाठी वेळीच पाऊले उलण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाभरातील वाळू उपसा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या याचा हा आढावा.
गोदावरी काठावरील झोला, खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, धारखेड, नागठाणा, महातपुरी, आनंदवाडी, भांबरवाडी, दुसलगाव, मैराळ सावंगी, मसला, पिंपरी झोला या ठिकाणच्या नदी पात्रातून वाळूची तस्करी होत आहे. याचा त्रास शेतकरी व परिसरातील नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. शहराजवळील गोदावरील रेल्वे पुलाजवळही छोट्या-मोठय़ा वाळू तस्कराने थैमान घातले आहे. २0१३-१४ साठी तालुक्यात लिलाव झाले होते. नियमानुसार ३0 सप्टेंबर रोजी या लिलावाची मुदत संपली आहे. परंतु, गोदावरी पात्र कोरडे पडल्याने वाळू तस्करांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात महसूल प्रशासनाने ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी आदी वाहनांवर कारवाई करुन वाळू तस्करांकडून तीन लाखांचा दंड वसूल केला असला तरी मोठय़ा कारवाईची गरज आहे. निर्ढावलेल्या वाळू तस्करांवर लगाम बसला नाही तर अनर्थ होण्याची शक्यता जनतेतून ऐकावयास मिळत आहे. 
भरमसाठ वाळू भरुन वाहने गोदापात्रातून नेली जातात. नियम डावलून उपसा होतो. परंतु, प्रशासन मात्र कारवाई करीत नाही. 
गोदावरी पात्रातून वाळू उपस्याला लगाम बसावा, यासाठी पात्रात मालवाहतूक करणारे ट्रॅक, ट्रॅक्टर, टिप्पर या सारख्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, २१ नोव्हेंबरपासून लागू केले आहेत, अशी माहिती तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी दिली. गंगाखेड शहरालगतचे ओसाड पडलेले गोदावरी पात्र सामान्यांना होतोय त्रास
> वाळू वाहतुकीमुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. वाळू वाहतूक करणारे वाहन ज्या रस्त्याने नेले जाते. ते रस्ते खराब झाले आहेत. ग्रामस्थांच्या दररोजच्या वाहतुकीचे हे रस्ते खड्डे पडून चाळणी झाले आहेत. वाळू उपस्यामुळे गावातील विहिरी व हातपंपांच्या पाणी पातळीवरही परिणाम होत आहे.
सिंह यांनी घालावे लक्ष
> वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे