शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

विद्यापीठ नामविस्तार लढ्याला परभणीतून मिळाली ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:55 IST

औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सलग १८ वर्षे नेटाने लढलेला नामविस्तार लढा परभणीतील तीन पिढ्यांचा साक्षीदार ठरला आहे़ विशेष म्हणजे, या लढ्याला परभणी जिल्ह्यातूनच ऊर्जा मिळाली. नामविस्तार दिनाच्या लढ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचे योगदान राहिले आहे़

प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सलग १८ वर्षे नेटाने लढलेला नामविस्तार लढा परभणीतील तीन पिढ्यांचा साक्षीदार ठरला आहे़ विशेष म्हणजे, या लढ्याला परभणी जिल्ह्यातूनच ऊर्जा मिळाली. नामविस्तार दिनाच्या लढ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचे योगदान राहिले आहे़१४ जानेवारी १९९४ रोजी औरंगाबाद येथील विद्यापीठाचा डॉ़बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला अन् दरवर्षी हा नामविस्तार दिन साजरा केला जातो़ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने या मागणीसाठी झालेल्या लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदान यासंदर्भाने माहिती घेतली. तेव्हा जिल्ह्यातील तीन पिढ्यांनी या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविल्याचे समोर आले आहे़ विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर याच वर्षात पुलोद सरकारच्या काळात राज्याच्या दोन्ही सभागृहात या प्रस्तावाला एकमताने मंजुरी मिळाली; परंतु, या नामांतराला काही जणांनी विरोध केला आणि तेथून पुढे या लढ्याला सुरुवात झाली़परभणी जिल्ह्यात नामांतर लढ्यासाठी आंबेडकरी चळवळीतील अनेकांनी योगदान दिले. राज्यातील गढूळ झालेले वातावरण पाहता त्या काळात जिल्ह्यात पँत्थरच्या छावण्या, दलित, मुस्लीम सुरक्षा महासंघांची स्थापना झाली़ येथूनच पुढे नामांतराचा लढा तीव्र झाला़ विद्यापीठाच्या नामंतराची मागणी होत असताना याच काळात परभणी येथील श्रीधर उबाळे, शंकर भालेराव, मुकूंद मकरंद, रविंद्र तेलगोटे, रामचंद्र शेळके, शंकर शेळके हे युवक औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेत होते़ या विद्यार्थ्यांनी लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला़ जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत नागपूर ते औरंगाबाद असा लाँगमार्च काढण्यात आला होता़ त्यात या युवकांनी सहभाग नोंदविल्याने त्यांच्याविरूद्ध गुन्हेही नोंद झाले होते़ परभणीत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बी़एच़ सहजराव, माधवराव हतागळे, रानूबाई वायवळ, विजय वाकोडे, के़टी़ उबाळे आदींनी या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला़ मोर्चे, आंदोलनांनी हा लढा पेटता ठेवण्यात आला़ विशेष म्हणजे, तीन पिढ्यांमधील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या लढ्यात हिरीरीने सहभागी झाले होते़ १८ वर्षांच्या संघर्षपूर्ण लढ्यानंतर औरंगाबाद येथील विद्यापीठाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला आणि त्यानंतर या लढ्याला यश प्राप्त झाले़औरंगाबाद येथील विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी उभारलेल्या लढ्यात परभणी जिल्ह्याचे मोठे योगदान असून, चळवळीतील कार्यकर्त्यांच्या तीन पिढ्या या लढ्याच्या साक्षीदार ठरल्या आहेत.शेवटपर्यंत लढा दिलानामांतर ही आमच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई होती़ जिल्ह्यात आम्ही हिरीरीने या लढाईत सहभागी झालो़ या लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले़ काहींच्या घरांचे नुकसान झाले़ १७ वर्षाच्या या संघर्षामध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल झाले़ रासुकाखाली अटक करण्यात आली; परंतु, संघर्ष सोडला नाही़ नामांतराची मागणी असताना या विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला; परंतु, आता मात्र या विद्यापीठाला केंद्राचा दर्जा द्यावा, अशी आमची मागणी आहे़-विजय वाकोडे, परभणीआठवणींनीही शहारे येतातनामांतराच्या लढ्याचा मी साक्षीदार आहे़ त्या काळात घडलेल्या घटना आठवल्या की आजही अंगावर शहारे येतात़ जागोजागी होणारी जाळपोळ आणि दंग्यामुळे वातावरण अस्वस्थ करणारे झाले होते़ विद्यापीठाचे नामांतर व्हावे, अशी यासाठी उभारलेल्या लढ्यात मी स्वत: सहभागी झालो होतो़ या लढ्यामध्ये कारावासही भोगावा लागला़ अखेर १७ वर्षानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला़ प्रत्यक्ष मागणी मान्य झाली नसली तरी जे दिलं ते आम्ही स्वीकारलं़-बी़एच़सहजराव, परभणीलढ्यात कारावास भोगलाडॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला मिळावे, यासाठी उभारलेल्या लढ्यामध्ये दोन-तीन दिवसांचा कारावास भोगावा लागला़ त्याकाळची परिस्थिती अत्यंत विदारक होती़ जागोजागी दंगल, जाळपोळ होत असल्याने त्या-त्या ठिकाणी जावून कार्यकर्त्यांना धीर देण्याचे काम केले़ प्रशासनाच्या विरोधात बांगडी मोर्चा काढला़ महिलांना संघटीत करून विद्यापीठाच्या नामांतरासाठी लढा उभारला़ परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात दररोज दौरे करून या लढ्याला गती दिली़-रानूबाई वायवळ, परभणीलढ्याने आत्मसन्मान दिला१९७७ पासून नामांतराच्या लढ्यात सहभागी झालो आहे़ विद्यार्थी दशेत असताना नामांतर विरोधी कृती समितीने शिवाजी कॉलेज बंद पाडले़ त्यावेळी मी स्वत: पुढाकार घेवून १५ दिवस हे कॉलेज सुरू ठेवले़ या संपूर्ण लढ्याच्या काळात परभणी, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी कारावास भोगला आहे़ नामांतराचा लढा हा सामाजिक समतेचा लढा होता़ या लढ्याने दलित तरुण संघटन उभे राहिले़ या लढ्याच्या माध्यमातून समाजामध्ये आत्मसन्मान निर्माण झाला़-माधवराव हतागळे, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीuniversityविद्यापीठ