शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी हवी सकारात्मक दृष्टी

By admin | Updated: March 4, 2015 15:36 IST

परभणीसह मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी राजकर्त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन अन् त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याची मानसिकता हवी.

अभिमन्यू कांबळे ल्ल /परभणीपरभणीसह मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी राजकर्त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन अन् त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याची मानसिकता असेल तरच मराठवाड्यावरील मागासलेपणाचा ठपका पुसून काढता येईल अन्यथा केवळ परिषदा घेऊन अन् तोंडाची वाफ घालून काहीही फायदा होणार नाही, याची सातत्याने राजकर्त्यांनी जाण ठेवणे गरजेचे आहे. दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. मराठवाड्याने राज्याला चार मुख्यमंत्री दिले. तरीही मराठवाड्याचा दुष्काळ हटलेला नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे राज्याच्या राजकारणावरील वर्चस्व झुगारुन देण्यात मराठवाड्यातील नेते मंडळी ही कमी पडली. परिणामी मुख्यमंत्री पद असूनही विभागाचा विकास करता आला नाही. त्यामुळे आजही मराठवाडा मागासलेला म्हणूनच ओळखला जातो. किती दिवस हा मागासलेपणाचा ठपका लावून घ्यायचा, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्याप्रमाणेच विदर्भाचीही अवस्था तशीच आहे. त्यामुळे मागासलेपणाची हेटाळणी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहन केलेलीच आहे. त्यामुळे त्यांना मराठवाड्याचे खरे दु:ख माहिती आहे. विजय केळकर समितीने गेल्या वर्षाच्या अखेरीस विकासाच्या दृष्टीकोनातून राज्यशासनाकडे अहवाल सादर केला. या अहवालात अनेक महत्त्वपूर्ण बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या अहवालाचा विचार करुन राज्य शासनाने विकासाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली तरी परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही. फक्त तालुका हा विकासाचा घटक न धरता विभाग हा घटक विकासासाठी धरणे आवश्यक आहे. केळकर समितीने दिलेल्या अहवालाप्रमाणे मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेड या जिल्ह्यातील सिंचन सामान्य आहे. उर्वरित जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात सिंचनाची मोठय़ा प्रमाणात तूट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही तूट दूर करायची कशी, यावरच खल करणे आता गरजेचे आहे. ज्याप्रमाणे विदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठका होतात. त्याचप्रमाणे औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्याचा पायंडा काही वर्षांपूर्वी पडला होता. परंतु, पुन्हा एकदा पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते मंडळींचे विघ्न आले आणि बैठका होणे बंद झाले. त्यामुळे मराठवाड्यातील प्रश्नांवर चर्चा होणे थांबले. मराठवाड्याच्या विकासासाठी पाहण्याची दृष्टी बदलणे आवश्यक आहे. याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजुला ठेवून विकासाचे धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. असे झाले तरच दुष्काळ निवारण व जलनियोजन परिषदेचा हेतू सफल ठरेल. अन्यथा केवळ औपचारिकता म्हणूनच ही परिषद झाली, असे समजले जाईल.

 ■ परभणी जिल्ह्याचा विचार केला असता राज्य शासनाला अजूनही हिंगोली जिल्हा मान्यच नाही. त्यामुळे हिंगोलीचा समावेश परभणीतच करण्यात आलेला आहे. त्यानुसार या दोन जिल्ह्यात केवळ १६.५ टक्के सिंचन क्षेत्र दाखविण्यात आले आहे. तब्बल ८३.५ टक्के सिंचनाची तूट अहवालात दाखविण्यात आली आहे.