शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात पोलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू झाली असून, १६ जानेवारी रोजी या निवडणुकीत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात ...

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू झाली असून, १६ जानेवारी रोजी या निवडणुकीत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतदानाच्या दिवशी लागणारा बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, परजिल्ह्यातूनही बंदोबस्त दाखल झाला आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निवडणुका शांततेत पार पडण्याचे आवाहन केले आहे. १६ जानेवारी रोजी लागणाऱ्या बंदोबस्ताची पोलीस प्रशासनाने संपूर्ण तायरी करून ठेवली आहे.

याचाच एक भाग म्हणून ११ जानेवारी रोजी जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायती, त्याचप्रमाणे मोठ्या ग्रामपंचायतीत पोलीस कर्मचाऱ्यांची पथसंचलन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे. पूर्णा, ताडकळस, जिंतूर, परभणी, पाथरी, पालम, गंगाखेड या तालुक्यांमध्ये अनेक गावांत पथसंचलन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, कुठेही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

८९ ग्रामपंचायती संवेदनशील

जिल्ह्यात ८९ ग्रामपंचायती संवेदनशील असल्याची मािहिती पोलिसांनी दिली. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये रुट मार्च करण्यात आले आहे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, ८५ सेक्टरची जिल्ह्यात निर्मिती करण्यात आली असून, या सेक्टरच्या साह्याने संवेदनशील बुथवर देखरेख ठेवली जाणार आहे.

एकूण ग्रामपंचायती

५६६

बिनविरोध ग्रामपंचायती

६७

निवडणूक होत असलेल्या ग्रा.पं.

४९९

एकूण मतदान केंद्र

१,५८२