शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात पोलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू झाली असून, १६ जानेवारी रोजी या निवडणुकीत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात ...

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू झाली असून, १६ जानेवारी रोजी या निवडणुकीत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतदानाच्या दिवशी लागणारा बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, परजिल्ह्यातूनही बंदोबस्त दाखल झाला आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निवडणुका शांततेत पार पडण्याचे आवाहन केले आहे. १६ जानेवारी रोजी लागणाऱ्या बंदोबस्ताची पोलीस प्रशासनाने संपूर्ण तायरी करून ठेवली आहे.

याचाच एक भाग म्हणून ११ जानेवारी रोजी जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायती, त्याचप्रमाणे मोठ्या ग्रामपंचायतीत पोलीस कर्मचाऱ्यांची पथसंचलन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे. पूर्णा, ताडकळस, जिंतूर, परभणी, पाथरी, पालम, गंगाखेड या तालुक्यांमध्ये अनेक गावांत पथसंचलन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, कुठेही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

८९ ग्रामपंचायती संवेदनशील

जिल्ह्यात ८९ ग्रामपंचायती संवेदनशील असल्याची मािहिती पोलिसांनी दिली. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये रुट मार्च करण्यात आले आहे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, ८५ सेक्टरची जिल्ह्यात निर्मिती करण्यात आली असून, या सेक्टरच्या साह्याने संवेदनशील बुथवर देखरेख ठेवली जाणार आहे.

एकूण ग्रामपंचायती

५६६

बिनविरोध ग्रामपंचायती

६७

निवडणूक होत असलेल्या ग्रा.पं.

४९९

एकूण मतदान केंद्र

१,५८२