शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात पोलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू झाली असून, १६ जानेवारी रोजी या निवडणुकीत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात ...

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू झाली असून, १६ जानेवारी रोजी या निवडणुकीत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतदानाच्या दिवशी लागणारा बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, परजिल्ह्यातूनही बंदोबस्त दाखल झाला आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निवडणुका शांततेत पार पडण्याचे आवाहन केले आहे. १६ जानेवारी रोजी लागणाऱ्या बंदोबस्ताची पोलीस प्रशासनाने संपूर्ण तायरी करून ठेवली आहे.

याचाच एक भाग म्हणून ११ जानेवारी रोजी जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायती, त्याचप्रमाणे मोठ्या ग्रामपंचायतीत पोलीस कर्मचाऱ्यांची पथसंचलन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे. पूर्णा, ताडकळस, जिंतूर, परभणी, पाथरी, पालम, गंगाखेड या तालुक्यांमध्ये अनेक गावांत पथसंचलन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, कुठेही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

८९ ग्रामपंचायती संवेदनशील

जिल्ह्यात ८९ ग्रामपंचायती संवेदनशील असल्याची मािहिती पोलिसांनी दिली. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये रुट मार्च करण्यात आले आहे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, ८५ सेक्टरची जिल्ह्यात निर्मिती करण्यात आली असून, या सेक्टरच्या साह्याने संवेदनशील बुथवर देखरेख ठेवली जाणार आहे.

एकूण ग्रामपंचायती

५६६

बिनविरोध ग्रामपंचायती

६७

निवडणूक होत असलेल्या ग्रा.पं.

४९९

एकूण मतदान केंद्र

१,५८२