शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पोलिसांनी हद्द ओलांडली, तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST

परभणी जिल्हा गृह विभागाच्या नियमानुसार व घडणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण लक्षात घेता संवेदनशील म्हणून गणला जातो. जिल्ह्यात ९ तालुक्यात मिळून ...

परभणी जिल्हा गृह विभागाच्या नियमानुसार व घडणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण लक्षात घेता संवेदनशील म्हणून गणला जातो. जिल्ह्यात ९ तालुक्यात मिळून एकूण १९ पोलीस स्टेशन आहेत. या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले जातात. तसेच येथून तपासही केला जातो. शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी दररोज किरकोळ हाणामारी, चोरी तसेच भांडणे, अपघात, खून असे प्रकार कुठे ना कुठे घडत असतात. या सर्व तक्रारींची दखल पोलिसांकडून घेतली जाते. मात्र, कधी कधी पोलिसांच्या समोर हद्दीचा प्रश्न निर्माण होतो. आणि यातून फिर्याद देण्यासाठी आलेल्या फिर्यादीला अनेक प्रश्न विचारुन पोलीस भंडावून सोडतात. यामुळे तक्रारदार तक्रार देण्यास धजावत नाहीत. असे अनेक प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.

जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे - १९

पोलीस अधिकारी - १३२

पोलीस कर्मचारी - १८५८

तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई

प्रत्यक्षात सीआरपीसी १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे. तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या ठाण्याची असल्यास नंतर तो त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. मात्र तसे घडत नाही.

ही घ्या उदाहरणे

दुचाकी चोरी झाली

शहरातील कुठूनही दुचाकीची चोरी झाल्यास पोलीस स्थानकात गेल्यावर किमान २ दिवस फिर्यादीलाच सगळीकडे शोध घेऊन थांबण्यास सांगितले जाते. किमान २ ते ३ दिवस झाल्यावर मगच चोरी झाल्याची तक्रार घेतली जाते. असे प्रकार शहरातील ४ पोलीस ठाण्यात अनेकांबाबत दररोज घडले आहेत.