शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी जिल्ह्यात २५ लाख वृक्षांचे झाले रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:55 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.राज्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने मागील दोन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात दोन वर्षात जवळपास ६ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. काही ठिकाणी वृक्षांचे संगोपन झाले. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी गतवर्षीच्याच वृक्ष रोपणाच्या जागेवरच यावर्षीचे वृक्षारोपण केले आहे.राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत देण्यात आलेले उद्दिष्ट जिल्ह्यातील ४८ विभागांना पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात २५ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेला १ लाख ६५ हजार ४२५ वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९८ हजार १०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.कृषी विभागाला १ लाख ८४ हजार १८५ रोपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत २ लाख २२ हजारांचे वृक्ष लागवड केले आहेत. गृह विभागाला ५ हजार १५ झाडांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार १००, औद्योगिक संस्थांना ३८ हजार २१५ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५ हजार ६०० झाडांचे रोपण करण्यात आले आहे. अन्य ४८ विभागांना ३४ लाख १५ हजार ७६४ वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार