शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या धुळीने परभणीकर झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:45 IST

रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात न मिळणाºया परभणी शहरात आता नागरिक वाढत्या धुळीच्या त्रासाने बेजार झाले आहेत़ शहरातील धुळी संदर्भात नागरिकांची मते जाणून घेतली तेव्हा इतर तालुक्यांच्या गावांच्या तुलनेत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणी शहरात धुळीचे प्रदूषण सर्वाधिक असल्याचे मत नागरिकांनी ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात न मिळणाºया परभणी शहरात आता नागरिक वाढत्या धुळीच्या त्रासाने बेजार झाले आहेत़ शहरातील धुळी संदर्भात नागरिकांची मते जाणून घेतली तेव्हा इतर तालुक्यांच्या गावांच्या तुलनेत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणी शहरात धुळीचे प्रदूषण सर्वाधिक असल्याचे मत नागरिकांनी ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे़शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत़ रस्त्याची नवीन कामे सुरू होत नाहीत़ जी कामे सुरू झाली, ती अनेक दिवस रखडत आहेत़ या सर्व बाबींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे़ सद्यस्थितीला वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलीकण मिसळत असून, याचे प्रदूषण परभणीकरांच्या आरोग्यालाच घातक ठरू लागले आहे़ त्यामुळे शहरातील वाढत्या धुळीविषयी नागरिकांना काय वाटते? हे ‘लोकमत’ने सर्वेक्षणातून जाणून घेतले़परभणी शहरात धुळीचे प्रमाण कसे आहे? या प्रश्नावर ९४ टक्के नागरिकांनी सर्वाधिक असे उत्तर देऊन धुळीच्या प्रदूषणाचा वाढलेला विळखा निदर्शनास आणून दिला़ ६ टक्के नागरिकांना मात्र इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे, असे वाटते़शहरातील धुळीच्या प्रदूषणाला कोण जबाबदार? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ८४ टक्के नागरिकांनी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले़ १० टक्के नागरिकांनी केवळ सार्वजनिक बांधकाम विभागावर ठपका ठेवला़ तर ६ टक्के नागरिकांनी केवळ महानगरपालिका जबाबदार असल्याचे सांगितले़ वाढत्या धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे का? या प्रश्नावर ७० टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले आहे़ १८ टक्के नागरिकांनी नाही, असे म्हटले तर १२ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले़एकंदर शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे़ प्रत्येक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ झाल्याने नागरिक त्रस्त आहेत़ शहरातील सार्वजनिक रस्त्यांची नियमित सफाई होत नसल्यानेही धूळ वाढत आहे़ त्याचबरोबर शहरातील काही भागात रस्त्यांची कामे अर्धवट झाली आहेत़ रस्त्यावर खड्डे खोदून त्यातील माती रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली़ वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती हवेत मिसळून धुळीचा त्रास वाढत चालला आहे़ वाढत्या धुळीमुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाच काळजी घ्यावी लागत आहे़ सोबत रुमाल, डोळ्यावर गॉगल घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे़ मागील सहा महिन्यांपासून हा त्रास नागरिकांना अधिक सहन करावा लागत आहे़ त्यामुळे रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा मिळविण्याबरोबरच आता धुळीच्या त्रासापासून सुटका करावी, अशी नागरिकांची मागणी आहे़ मात्र महापालिकेने अजूनही ठोस पावले उचलली नाहीत़