शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वाढत्या धुळीने परभणीकर झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:45 IST

रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात न मिळणाºया परभणी शहरात आता नागरिक वाढत्या धुळीच्या त्रासाने बेजार झाले आहेत़ शहरातील धुळी संदर्भात नागरिकांची मते जाणून घेतली तेव्हा इतर तालुक्यांच्या गावांच्या तुलनेत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणी शहरात धुळीचे प्रदूषण सर्वाधिक असल्याचे मत नागरिकांनी ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात न मिळणाºया परभणी शहरात आता नागरिक वाढत्या धुळीच्या त्रासाने बेजार झाले आहेत़ शहरातील धुळी संदर्भात नागरिकांची मते जाणून घेतली तेव्हा इतर तालुक्यांच्या गावांच्या तुलनेत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणी शहरात धुळीचे प्रदूषण सर्वाधिक असल्याचे मत नागरिकांनी ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे़शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत़ रस्त्याची नवीन कामे सुरू होत नाहीत़ जी कामे सुरू झाली, ती अनेक दिवस रखडत आहेत़ या सर्व बाबींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे़ सद्यस्थितीला वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलीकण मिसळत असून, याचे प्रदूषण परभणीकरांच्या आरोग्यालाच घातक ठरू लागले आहे़ त्यामुळे शहरातील वाढत्या धुळीविषयी नागरिकांना काय वाटते? हे ‘लोकमत’ने सर्वेक्षणातून जाणून घेतले़परभणी शहरात धुळीचे प्रमाण कसे आहे? या प्रश्नावर ९४ टक्के नागरिकांनी सर्वाधिक असे उत्तर देऊन धुळीच्या प्रदूषणाचा वाढलेला विळखा निदर्शनास आणून दिला़ ६ टक्के नागरिकांना मात्र इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे, असे वाटते़शहरातील धुळीच्या प्रदूषणाला कोण जबाबदार? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ८४ टक्के नागरिकांनी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले़ १० टक्के नागरिकांनी केवळ सार्वजनिक बांधकाम विभागावर ठपका ठेवला़ तर ६ टक्के नागरिकांनी केवळ महानगरपालिका जबाबदार असल्याचे सांगितले़ वाढत्या धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे का? या प्रश्नावर ७० टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले आहे़ १८ टक्के नागरिकांनी नाही, असे म्हटले तर १२ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले़एकंदर शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे़ प्रत्येक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ झाल्याने नागरिक त्रस्त आहेत़ शहरातील सार्वजनिक रस्त्यांची नियमित सफाई होत नसल्यानेही धूळ वाढत आहे़ त्याचबरोबर शहरातील काही भागात रस्त्यांची कामे अर्धवट झाली आहेत़ रस्त्यावर खड्डे खोदून त्यातील माती रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली़ वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती हवेत मिसळून धुळीचा त्रास वाढत चालला आहे़ वाढत्या धुळीमुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाच काळजी घ्यावी लागत आहे़ सोबत रुमाल, डोळ्यावर गॉगल घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे़ मागील सहा महिन्यांपासून हा त्रास नागरिकांना अधिक सहन करावा लागत आहे़ त्यामुळे रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा मिळविण्याबरोबरच आता धुळीच्या त्रासापासून सुटका करावी, अशी नागरिकांची मागणी आहे़ मात्र महापालिकेने अजूनही ठोस पावले उचलली नाहीत़